शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास प्राधान्य - राज्य सरकार

By admin | Updated: January 29, 2016 01:59 IST

मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे काहीही निर्णय घेण्यापूर्वी सरकारला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि त्याची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे या केसमधील विशेष सरकारी वकील एस. के. नायर यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाला सांगितले.उपनगरीय लोकलची क्षमता १,६०० असताना पिक अवरमध्ये याच लोकमधून ४,७०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. तर बेस्टच्या प्रत्येक चौ. मी वर १२ प्रवासी उभे असतात. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर दुप्पट ताण पडत असल्याची बाब अ‍ॅड. नायर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता कशी वाढवण्यात येईल, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांच्या दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत, असे म्हणत या समित्यांचा अहवाल सादर करण्यासाठी अ‍ॅड. नायर यांनी काही दिवसांची मुदत खंडपीठाकडून मागून घेतली.मुंबईतील वाढती वाहन संख्या आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरकारी वकीलांनी वरील माहिती खंडपीठाला दिली. त्याशिवाय दिल्लीप्रमाणे मुंबईतही ‘सम-विषम’ नंबर असलेल्या वाहनांचा प्रयोग करून पहावा, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सामाजिक कार्यकर्ते शदाब पटेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वायु प्रदूषण कमी व्हावे, यासाठी याचिका दाखल केली आहे.तर दुसरी याचिका बॉम्बे एन्वॉयरोन्मेंट अ‍ॅक्शन ग्रुप या एनजीओने १९९९ मध्ये दाखल केली आहे. मुंबईवरील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येला आळा बसावा, यासाठी व्ही. एम. लाल समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी या समितीने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. हायकोर्टाने या याचिकांवरील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी ठेवत वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काय पावले उचललीत आणि यापुढे कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार? ही माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)