शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदी सुरू

By admin | Updated: May 4, 2017 05:30 IST

पावसाळा महिन्या भरावर आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेडयापाडयातील आदिवासी व शेतकरी हंगामपूर्व

विक्रमगड : पावसाळा महिन्या भरावर आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजूच्या खेडयापाडयातील आदिवासी व शेतकरी हंगामपूर्व कामाला लागतो़ त्यामुळे व संततधार पावसामुळे त्याला बाजारहाट (खरेदी) करण्यास वेळच मिळत नाही़. त्यामुळे तो पावसाळयापूर्वीच मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये विविध प्रकारची सुकी मच्छी अशा अनेकविध गरजेच्या वस्तूंचा तीन ते चार महिने पुरेल असा साठा करुन ठेवतो़ सध्या अशा खरेदीला येथे सुरुवात झाली आहे. तिलाच या भागतील आदिवासी अगोट म्हणतात़़प्रत्येक गाव-पाडयांमध्ये भरणा-या आठवडीबाजारात मान्सूनपूर्व खरेंदीसाठी आदिवासी शेतक-यांची झुंबड उडाली आहे. आज महागाईचा भस्मासुर डोक्यावर असतांनाही खरेदीमात्र कर्ज उधार, उसनवार करून केली जाते आहे. कारण पाउस सुरू झाल्यावर येथे चार महिने भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरीता अडचणी निर्माण होतात. पावसाळयात जीवनावश्यक वस्तूंबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोरदार सुरु झाली असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे़ तिलाच ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात़ सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदी भागातून मावरे विक्रेत्या महिला विक्रमगड व ग्रामीण परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा आदी विविध खेडयापाडयातील आठवडे बाजारात येउन आपले दुकान थाटतात किंवा रोज डोक्यावर टोपले घेवून गावो गावी दारोदार फिरत असल्याने मावरे खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे आदिवासी ग्राहकांची, महिलांची एकच झुंबड उडत आहे़पावसाळयात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही,व हंगामाच्या कामा व्यतिरिक्त अन्य बाबींसाठी वेळ मिळत नसल्याने मे महिन्यात खवैय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो. पावसाळयात शेतीच्या कामांची घाई असल्याने बाजारात येवून ताजी मासळी मिळणे शक्य नसते त्यामुळे त्यांचा भर सुक्या मासळीवर असतो. यामध्ये बोंबील, कोलीम, आंबडकाड, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदेली, सुकट, खारे याचा समावेश असतो. पालघर, वसई, सातपाटी, डहाणू, वाणगाव या परिसरातून मोठया प्रमाणात ही मच्छी येत असते. उन्हाळयात विकली न गेलेली ताजी मासळी मच्छी व्यावसायिक मीठ लावून सुकवतात आणि मे महिन्यात ती विक्रीसाठी आणतात. त्यामुळे विक्रमगडच्या नाक्यावर परिसरात तसेच आजूबाजू साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात ही सुकी मासळी सध्या मोठया प्रमाणात विक्रीसाठी येत आहे़ पालघर, वसई, सातपाटी, केळवे, डहाणू येथून सुकी मासळी घेवून आलेल्या महिला बाजारात सुकी मच्छी विकत आहेत़ तसेच स्थानिक कोळी महिलाही गावात पाडयात सुकी मच्छी विकतांना दिसत आहेत़मात्र गेल्या काही वर्शात मोठया प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही(मावरा)बसला आहे़ दिवसभर पावसात भिजून आलेल्या गडयांला बांगडा भाजून दिला की त्याच्या चेह-यावर समाधान झळकते असते शिवाय कांद्यात तळलेल्या कोलीमबरोबर शेताच्या बांधावर बसून केलेल्या न्याहारीची चव काही वेगळीच असते. एकंदरीत सुकी मासळी (मावरे) ही ग्रामीण भागातील शेतक-यांच्या जेवणातील अतिशय महत्वाचा घटक आहे़ त्यामुळे दर वाढले असले तरी सुकी मासळी खरेदी करणा-या ग्राहकांची गर्दी काही कमी झालेली नाही. यालाच बहुदा मजबूरी का नाम महात्मा गांधी असे म्हटले जात असावे (वार्ताहर)