शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पृथ्वीराज चव्हाणांच्या गच्छंतीच्या बातमीवरून रंगले चर्चांचे फड

By admin | Updated: June 12, 2014 15:04 IST

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती. मात्र राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, राज्यातील दारूण पराभवामुळे पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवा चेहरा आणण्यात येणार होता. नवे मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील , बाळासाहेब थोरात किंवा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांपैकी एकाची राज्यात वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.  मात्र माणिकरावांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या असा कोणताही निर्णय होण्याची शक्यता नसून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा असेल. 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून पार खावा लागला. राज्यात पक्षाला अवघ्या दोन जांगा मिळाल्या. या पराभवासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबादार ठरवण्यात येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या   कारभारबद्दल काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीह नाराजी व्यक्त करत त्यांना हटवण्याच्या मागणी लावून धरली होती. त्याच पार्श्वभूमीवर चव्हाणांची गच्छंती अटळ असल्याचे वृत्त येत होते. 
मात्र खुद्द काँग्रेसकडूनच या बातमीचे खंडन करण्यात आल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.