शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्राथ. शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: May 18, 2017 01:19 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : ‘सुगम’, ‘दुर्गम’बाबत याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून १६ जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिल्याने आता शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता मावळली आहे. यंदा शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने नवा आदेश काढला होता. त्यानुसार ‘सुगम आणि दुर्गम गावे’ आणि त्यानुसार बदली असे धोरण ठेवले होते. ज्यांनी दहा वर्षे ‘सुगम’ गावांमध्ये काम केले आहे त्यांना सक्तीने ‘दुर्गम’ गावांमध्ये जाणे बंधनकारक होते. याबाबत तालुका पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होऊन २० मेपासून जिल्हा पातळीवरील बदली प्रक्रिया सुरू होणार होती. जिल्ह्णात २००२ शाळा असून त्यातील १३५६ गावे ही ‘सुगम’मध्ये तर ६४६ गावे ‘दुर्गम’मध्ये टाकण्यात आली होती. दरम्यान, शासनाच्या या ‘सुगम’, ‘दुर्गम’ निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेने मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी याबाबत सुनावणी होऊन १६ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली. संघटनेच्यावतीने अ‍ॅड. तानाजी मातुगडे यांनी तर सरकारी वकील म्हणून विकास माळी यांनी काम पाहिले. न्या. गडकरी व न्या. बदंग यांच्यासमोर ही सुनावणी झाली. दोन प्रकारच्या बदल्यांना स्थगितीएकीकडे जिल्हा परिषदेतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांना औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली असताना दुसरीकडे जिल्ह्णातील प्राथमिक शिक्षकांच्याही बदल्यांना स्थगिती मिळाली आहे.