शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ स्पर्धेचं आयोजन करणार : प्रकाश जावडेकर

By admin | Updated: June 5, 2017 18:52 IST

स्वच्छ भारत मोहिमेच्या धर्तीवर देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांसाठी ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 5 - स्वच्छ भारत मोहिमेच्या धर्तीवर देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांसाठी ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली. सर्व शैक्षणिक संस्थांसाठी ही स्पर्धा खुली राहणार असून जानेवारी महिन्यात सर्वेक्षण करून फेब्रुवारीमध्ये विजेत्या संस्थांना पुरस्कार दिले जातील, असे जावडेकर यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनी कोथरूड येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (एससीसीएन)च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, टेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र शेंडे, एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी एडीटीचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश कराड, प्राचार्य डॉ.जय गोरे, प्रा. प्रकाश जोशी व डॉ.मिलिंद पांडे उपस्थित होते. 
जावडेकर म्हणाले, पाणी व उर्जा बचत, कचºयाचे व्यवस्थापन चांगल्यापध्दतीने करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कामातूनच हे धडे मिळावे, हा ‘स्वच्छ कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस’ हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. देशातील ८०० विद्यापीठे व सुमारे ४० हजार महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुल असेल. सर्व शैक्षणिक संस्थांनी आपला कॅम्पस स्वच्छ करून स्वच्छ भारत मोहिमेचा भाग व्हावे, ही अपेक्षा आहे. त्यामध्ये पाणी, उर्जा बचत, कचºयाचे व्यवस्थापन हे महत्वाचे मुद्दे आहेत. यामध्ये उत्कृष्ट काम करणाºया संस्थांना स्मार्ट कॅम्पस घोषित करून पुरस्कार दिले जातील. जानेवारीमध्ये संस्थांचे परीक्षण करून फेब्रुवारीमध्ये पुरस्कार दिले जातील. युजीसी, एआयसीटीमार्फत स्पर्धेच्या नियम-अटी तयार केल्या जातील. अनेक शाळांमध्ये हे काम चांगले सुरू आहे. त्यामुळे ही स्पर्धा एक वर्षानंतर शाळा स्तरावरही आयोजित करण्याचे नियोजन आहे.
पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय चर्चेपासून पुर्वी भारत दुर असायचा. प्रत्येक गोष्टीला विरोध करणारा देश, असे संबोधले जायचे. पण आम्हीी हे चित्र बदलले. पर्यावरणाच्या रक्षणामुळे शाश्वत जीवनाची हमी मिळेल. यासाठी भारताने खुप काम केले आहे. प्रत्येक राज्यात वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापनातही आघाडी घेतली आहे, असे जावडेकर म्हणाले.
कॅम्पस क्लाऊड नेटवर्क हा प्रकल्प म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि शाश्वत विकास यांचे एकत्रीकरण असून त्यामुळे उज्वल भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडेल, असे डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले.
भटकलेले सुधारतील-
पर्यावररविषयक पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडला आहे. याविषयी बोलताना अमेरिकेचे नाव न घेता प्रकाश जावडेकर यांनी ‘जे भटकले आहेत ते सुधारतील’असा टोला लगावला. ते म्हणाले, या करारावर भारत ठाम आहे. पर्यावरणाचे संरक्षण हे भारतातील लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे. हा श्रध्देचा विषय आहे. पर्यावरणाच्या रक्षणातूनच जगाचे भले होणार आहे. त्यामुळे जे भटकले आहेत ते सुधारतील. भारत आपल्या मार्गाने चालत राहील.