शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

निती आयोगाच्या बैठकीत फडणवीसांच्या कामाचे कौतुक

By admin | Updated: April 24, 2017 03:01 IST

निती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीनिती आयोगाच्या बैठकीत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि भविष्याची रणनीती याबाबत खुली चर्चा केली. राज्यात कृषि क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याबाबत यावेळी फडणवीस यांची पाठ थोपटण्यात आली. फडणवीस यांनी यावेळी शेती क्षेत्रातील योजनांवर भाष्य केले. डाळींचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी काही सल्ले दिले. आयात धोरणात सुधारणा घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या भागात सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक सहकार्याची मागणी केली. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या योजनेमुळे कृषि क्षेत्रात १२.५ टक्क्यांचा विकास दर गाठता आला. कृषि क्षेत्रातील गुंतवणूक, व्यावसायिक नेटवर्क आणि पायाभूत सुविधात झालेल्या सुधारणा याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली. ग्राम पंचायतींना हायस्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महानेट योजनेसाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून चांगल्या सेवा देण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. सार्वजनिक वायफाय आणि डिजिटल ग्राम यासारख्या राज्य सरकारच्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. निती आयोगाच्या या बैठकीत महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक झाले. कृषि आणि सिंचन क्षेत्रातील सरकारच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारतात बदल घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला.