शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

३४ व्या अस्मितादर्श संमेलनाध्यक्षपदी प्रज्ञा दया पवार

By admin | Updated: December 27, 2016 19:13 IST

अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये १४ व जानेवारी २०१७ रोजी होत आहे.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 27 - गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन यंदा लातूरमध्ये १४ व जानेवारी २०१७ रोजी होत आहे. संमेलनाध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी येथे मंगळवारी पत्र परिषदेत दिली. प्राचार्य डॉ. माधव गादेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य व तत्वज्ञानातून मानवतावादी प्रागतिक मूल्यविचार उजागर करण्याच्या भूमिकेतून लातूर येथील दयानंद सभागृहात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वैचारिक अभिसरणाच्या दृष्टीने एक नवा सामाजिक संदेश या संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरात जाणार आहे. संविधानाचे शिल्पकार आणि दलित साहित्याचे प्रेरणास्थान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते आणि दलित साहित्याचे अध्वर्यु डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या प्रेरणेने संमेलनासाठी लातूरची निवड करण्यात आली आहे. अस्मितादर्श हे पुरोगामी विचाराचे नवे आकाश असून ते दलितेतरांनाही हितकारकच ठरले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, प्रा. भालचंद्र फडके, प्रा.रा.ग. जाधव यांनी अस्मितादर्शची प्रशस्ती केली असून, राजा ढाले, पद्मश्री नामदेव ढसाळ, डॉ. जनार्दन वाघमारे, पद्मश्री दया पवार, डॉ. एलिनॉर झेलिएट, प्रा. केशव मेश्राम ते सिसिलिया कार्व्हालो, वाहरु सोनवणे, प्रा. भुजंग मेश्राम, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आदींपासून नवोदितांपर्यंत सर्वांनाच अस्मितादर्शने प्रकाशाची दिशा दिली असल्याचेही डॉ. गादेकर म्हणाले. आजवर डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. निर्मलकुमार फडकुले, दया पवार, नागराज मंजुळे, रामनाथ चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, प्रा. केशव मेश्राम आदींनी अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. पत्र परिषदेला संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, उपाध्यक्ष प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, कार्यवाह डॉ. अशोक नारनवरे,  प्रा. युवराज धसवाडीकर, संजय घाडगे, डी.एस. नरसिंगे, डॉ. विजय अजनीकर आदींची उपस्थिती होती. विशेष सरकारी वकील निकम यांच्या हस्ते उद्घाटनलातुरात होत असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन शासनाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. आतापर्यंत झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे, कुसुमाग्रज, प्रा.म.भि. चिटणीस, प्रा. ग.प्र. प्रधान, मधुमंगेश कर्णिक, भाई माधवराव बागल, प्रा.मे.पु. रेगे आदींनी केले आहे. आता ३४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होत आहे.