शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

शेतक-यांचा संप वेदनादायी - पंकजा मुंडे

By admin | Updated: June 1, 2017 13:33 IST

शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 1 - शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करुन योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार या संपाबाबत आत्मपरीक्षण करेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. 
मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत पंकजा पुढेही असे म्हणाल्या की शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला आधार दिला पाहिजे.
 
कापसाला हमीभाव दिला. शेतक-यांना व्यापा-याला मध्यस्थी ठेवण्याचे सवय लागली असून ती तोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे सांगत यावेळी पंकजा यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
(माधव भांडारींना पक्षाने महाराष्ट्राबाहेर निर्यात करावं - मनसे)
 
""कर्जमाफी दिल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील याची शाश्वती नाही. कायमस्वरुपी उपाय राबवून शेतकरी स्वावलंबन करायचे असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी ठेऊन आहे. तुरीच्या बाबतीत शेतक-याला खूप त्रास सहन करावा लागला. शेतकरी केंद्रीत विकास करण्याचा प्रयत्न असून सफल होण्यासाठी वाट पहावी लागेल. सरकारच्या योजना पोहोचाव्यात यासाठी संवाद यात्रा काढली आहे. याआधी खतासाठी या राज्यात गोळीबार झालेत. अशी परिस्थिती आज नाही"", असा दावाही त्यांनी यावेळी केला. 
(वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलं 155 लिटर दूध)
हेलिकॅप्टरमधून शेततळी दिसतील
लोकं म्हणतात की मोदी घोषणा करीत आहेत. याआधी तर घोषणाही होत नव्हत्या. योजना लोकांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी असतात. सत्तेत आल्यावर पहिली दोन वर्ष घोषणांचीच असते. मागेल त्याला शेततळे याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मराठवाड्यात हेलिकॉप्टरमधून फिरताना आता शेततळे दिसतील, असे विश्वास यावेळी पंकजा यांनी व्यक्त केला. 
 
टीका सहन करण्यासाठी संयम हवा
आमदार अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांशी बोलताना केलेली वक्तव्ये तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेले विधान हे अहंकाराचे लक्षण आहे काय? असा प्रश्न विचारताच यावर पंकजा म्हणाल्या, ""राजकारण्यांनी अहंकारात राहू नये. अधिकारपदाचा मान राखून संवाद राखावा. परंतु टीका किती सहन करायची, याचीही मर्यादा आहे. अलिकडे राजकारण्यांना डिस्टर्ब करण्याचे प्रमाण वाढलंय"", असेही त्यांनी नमूद केले"". 
 
बीड रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ३ जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळीत येणार आहेत. मराठवाड्यासह नगर ते बीड मार्गे परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बीडसाठी रेल्वे वाहतूक महत्त्वाची आहे. बीडमध्ये १९ किमी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेशी संबंधीत उद्योग सुरु व्हावेत. पाणी कमी लागणारे उद्योग यावेत. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मुलींसाठी नॅपकीनचे उत्पादन बचतगटांकडून करून घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राम विकासखाते सर्वाधिक योजना राबवित असल्याचा दावा त्यांनी केला.