शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

प़ महाराष्ट्राला पावसाने झोडपले!

By admin | Updated: November 16, 2014 01:38 IST

जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला. नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला.

औरंगाबाद : मराठवाडय़ात गेल्या चोवीस तासात सर्वदूर मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद , जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड , हिंगोली आणि लातूर जिलतील बहुतांश भागात झालेल्या पावसामुळे रबी पिकांना दिलासा मिळाला.  
नगरमध्ये 32 मि.मी पाऊस अहमदनगर जिलत शुक्रवारी रात्रभर आवकाळी पावसाने तडाखा दिला. यात 32 मि.मी.च्या सरासरीने 448 मि.मी पावसाची नोंद झाली असून, तीन लाख हेक्टरवरील ज्वारीला जीवदान मिळाले आहे. काढणीला आलेल्या खरीप कांदा आणि सुरूवातीच्या टप्प्यात लावलेल्या कपाशीचे मात्र या पावसाने नुकसान झाले. या पावसामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईला दिलासा मिळणार असून, चारा पिकांचे उत्पादन वाढणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
नाशकात पिकांना फटका
दोन दिवसांपासून नाशिक जिलत सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पोळ कांद्यासह द्राक्ष पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, कांद्यावर करपा तर द्राक्षावर डावण्या रोगाचा पादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
साता:यात जोरदार हजेरी
सातारा शहरात शुक्रवारी रात्री नऊनंतर पावसाने झोडपून काढले. मध्यरात्री बारा वाजले तरी पावसाची संततधार सुरूच होती.  महाबळेश्वरसह वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठे उत्पादन घेतले जाते; पण काल, शुक्रवारी मध्यरात्री व आज, शनिवारच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आह़े 
सांगलीत द्राक्ष-डाळिंबाची हानी
सांगली-मिरज शहरांसह जिल्हाभरात शनिवारी पावसाची रिमङिाम सुरू होती, तर खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यांत दुपारी चारनंतर मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला आणि  काढणी-मळणीला आलेल्या भातपिकाचेही नुकसान झाले आहे. ऊसतोडणीची कामे ठप्प झाल्याने हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.  
नागपुरात ढगाळ वातावरण
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.अशी स्थिती दोन ते तीन दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. (लोकमत न्यूजनेटवर्क)