शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पवारांनी दाखविलेल्या दिशेनेच राज्याची वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:48 IST

सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. जलयुक्त शिवार, शेतीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, पायाभूत सूविधा उभ्या करण्यासाठी समृद्धी महामार्ग या मागे त्यांच्याच विचाराची प्रेरणा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरश्चंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पवार यांच्या भाषणाचे अनेक दाखले देत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची वाटचाल त्यांच्याच दिशेने कशी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.विदर्भात कारखाने आणायचे असतील तर नागपूर ते मुंबई पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे पवार यांनी १९८२ साली आपल्या भाषणात सांगितले होते. पवारांच्या त्याच संकल्पनेवर आम्ही समृद्धी मार्गाचे काम सुरू केले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पवार जे काही बोलले होते त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते ते मूलभूत विचार आहेत आणि आम्ही त्याच विचाराने या दोन भागांतील अनुषेश दूर करण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. विदर्भात वीज तयार करण्याचे प्रकल्प उभे राहिले; पण त्यांना कारखाने म्हणून पाहता येणार नाही, कारण विदर्भात तयार होणारी वीज सगळे राज्य वापरते आणि तोच विदर्भ २ टक्केसुद्धा वीज वापरत नाही, हे निरीक्षण स्वत: शरद पवार यांनी नोंदवले होते, याकडेही फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.आम्ही सूक्ष्म सिंचनाखाली शेती आणण्याचा प्रयत्न करतोय. तीदेखील त्यांचीच कल्पना आम्ही अमलात आणली, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी या अभिनंदन ठरावाचा पुरेपूर राजकीय वापर करून घेताना पवारांनी लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचारही वाचून दाखवले.मुख्यमंत्री असताना पवारांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, राज्य महिला आयोगाची स्थापना आणि संस्थांत्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.