शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पवारांनी दाखविलेल्या दिशेनेच राज्याची वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:48 IST

सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. जलयुक्त शिवार, शेतीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, पायाभूत सूविधा उभ्या करण्यासाठी समृद्धी महामार्ग या मागे त्यांच्याच विचाराची प्रेरणा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरश्चंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पवार यांच्या भाषणाचे अनेक दाखले देत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची वाटचाल त्यांच्याच दिशेने कशी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.विदर्भात कारखाने आणायचे असतील तर नागपूर ते मुंबई पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे पवार यांनी १९८२ साली आपल्या भाषणात सांगितले होते. पवारांच्या त्याच संकल्पनेवर आम्ही समृद्धी मार्गाचे काम सुरू केले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पवार जे काही बोलले होते त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते ते मूलभूत विचार आहेत आणि आम्ही त्याच विचाराने या दोन भागांतील अनुषेश दूर करण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. विदर्भात वीज तयार करण्याचे प्रकल्प उभे राहिले; पण त्यांना कारखाने म्हणून पाहता येणार नाही, कारण विदर्भात तयार होणारी वीज सगळे राज्य वापरते आणि तोच विदर्भ २ टक्केसुद्धा वीज वापरत नाही, हे निरीक्षण स्वत: शरद पवार यांनी नोंदवले होते, याकडेही फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.आम्ही सूक्ष्म सिंचनाखाली शेती आणण्याचा प्रयत्न करतोय. तीदेखील त्यांचीच कल्पना आम्ही अमलात आणली, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी या अभिनंदन ठरावाचा पुरेपूर राजकीय वापर करून घेताना पवारांनी लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचारही वाचून दाखवले.मुख्यमंत्री असताना पवारांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, राज्य महिला आयोगाची स्थापना आणि संस्थांत्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.