शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

पवारांनी दाखविलेल्या दिशेनेच राज्याची वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:48 IST

सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : सलग ५० वर्षांची संसदीय कारकिर्द गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर राज्याला जी दिशा दिली, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. जलयुक्त शिवार, शेतीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न, पायाभूत सूविधा उभ्या करण्यासाठी समृद्धी महामार्ग या मागे त्यांच्याच विचाराची प्रेरणा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरश्चंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधिमंडळात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पवार यांच्या भाषणाचे अनेक दाखले देत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची वाटचाल त्यांच्याच दिशेने कशी सुरू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.विदर्भात कारखाने आणायचे असतील तर नागपूर ते मुंबई पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे पवार यांनी १९८२ साली आपल्या भाषणात सांगितले होते. पवारांच्या त्याच संकल्पनेवर आम्ही समृद्धी मार्गाचे काम सुरू केले आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल पवार जे काही बोलले होते त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते ते मूलभूत विचार आहेत आणि आम्ही त्याच विचाराने या दोन भागांतील अनुषेश दूर करण्याचे काम करत आहोत, असेही ते म्हणाले. विदर्भात वीज तयार करण्याचे प्रकल्प उभे राहिले; पण त्यांना कारखाने म्हणून पाहता येणार नाही, कारण विदर्भात तयार होणारी वीज सगळे राज्य वापरते आणि तोच विदर्भ २ टक्केसुद्धा वीज वापरत नाही, हे निरीक्षण स्वत: शरद पवार यांनी नोंदवले होते, याकडेही फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.आम्ही सूक्ष्म सिंचनाखाली शेती आणण्याचा प्रयत्न करतोय. तीदेखील त्यांचीच कल्पना आम्ही अमलात आणली, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले. मुख्यमंत्र्यांनी या अभिनंदन ठरावाचा पुरेपूर राजकीय वापर करून घेताना पवारांनी लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचारही वाचून दाखवले.मुख्यमंत्री असताना पवारांनी केलेला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, राज्य महिला आयोगाची स्थापना आणि संस्थांत्मक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.