शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद - श्रीहरी अणे

By admin | Updated: August 29, 2016 22:29 IST

विदर्भासाठी तेलंगणासारखे आंदोलन व्हावे, अशी आमची अपेक्षा नाही. माणसे मारून आम्हाला विदर्भ नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा बॅलेटचा आहे. राजकीय पक्षांपुढे दबाव निर्माण

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 29 - विदर्भासाठी तेलंगणासारखे आंदोलन व्हावे, अशी आमची अपेक्षा नाही. माणसे मारून आम्हाला विदर्भ नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा बॅलेटचा आहे. राजकीय पक्षांपुढे दबाव निर्माण करण्यासाठी विदर्भाच्या नावाने राजकीय शक्ती निर्माण करून, येणा-या निवडणुकीच्या माध्यमातून ती दाखवून देणे गरजेचे आहे. सत्तेला गवसणी घालण्याइतकी राजकीय शक्ती निर्माण केल्याशिवाय विदर्भ राज्य मिळू शकणार नाही, असे मत ज्येष्ठ विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. 
 
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची दशा आणि दिशा’ या विषयावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन टिळक पत्रकार भवन सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. यात त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, विदर्भाचे आंदोलन हे जनआंदोलन नसल्याचे सत्ताधारी म्हणतात. सत्ताधारी या आंदोलनाला हिंसक करण्यासाठी डिवचत आहे. हिंसा करणे सोपी आहे. मात्र त्यातून निर्माण होणारा ब्रह्मराक्षस नियंत्रण करणे कठीण होईल. त्यामुळे विदर्भासाठी विश्वसनीय दबाव निर्माण करणारी चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. विदर्भासाठी मोठमोठ्या चळवळी झाल्या आहेत. जांबुवंतरावांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे सत्तेलाही गवसनी घातली होती. तेव्हा विदर्भ राज्याची निर्मितीही होऊ शकली असती.  परंतु ती चळवळ थांबविण्यात आली, पुढे ती संपलीही. अणे म्हणाले की, नीतेश राणे सांगतात विदर्भाच्या नावावर एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यांचे म्हणणे अतिशय योग्य आहे. विदर्भाच्या नावावर जोपर्यंत राजकीय शक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत विदर्भ मिळणार नाही.