शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

बुलेटने नव्हे बॅलेटने दाखवावी लागेल विदर्भाची ताकद - श्रीहरी अणे

By admin | Updated: August 29, 2016 22:29 IST

विदर्भासाठी तेलंगणासारखे आंदोलन व्हावे, अशी आमची अपेक्षा नाही. माणसे मारून आम्हाला विदर्भ नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा बॅलेटचा आहे. राजकीय पक्षांपुढे दबाव निर्माण

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 29 - विदर्भासाठी तेलंगणासारखे आंदोलन व्हावे, अशी आमची अपेक्षा नाही. माणसे मारून आम्हाला विदर्भ नको आहे. त्यामुळे दुसरा पर्याय हा बॅलेटचा आहे. राजकीय पक्षांपुढे दबाव निर्माण करण्यासाठी विदर्भाच्या नावाने राजकीय शक्ती निर्माण करून, येणा-या निवडणुकीच्या माध्यमातून ती दाखवून देणे गरजेचे आहे. सत्तेला गवसणी घालण्याइतकी राजकीय शक्ती निर्माण केल्याशिवाय विदर्भ राज्य मिळू शकणार नाही, असे मत ज्येष्ठ विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. 
 
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची दशा आणि दिशा’ या विषयावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन टिळक पत्रकार भवन सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. यात त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, विदर्भाचे आंदोलन हे जनआंदोलन नसल्याचे सत्ताधारी म्हणतात. सत्ताधारी या आंदोलनाला हिंसक करण्यासाठी डिवचत आहे. हिंसा करणे सोपी आहे. मात्र त्यातून निर्माण होणारा ब्रह्मराक्षस नियंत्रण करणे कठीण होईल. त्यामुळे विदर्भासाठी विश्वसनीय दबाव निर्माण करणारी चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. विदर्भासाठी मोठमोठ्या चळवळी झाल्या आहेत. जांबुवंतरावांनी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे सत्तेलाही गवसनी घातली होती. तेव्हा विदर्भ राज्याची निर्मितीही होऊ शकली असती.  परंतु ती चळवळ थांबविण्यात आली, पुढे ती संपलीही. अणे म्हणाले की, नीतेश राणे सांगतात विदर्भाच्या नावावर एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यांचे म्हणणे अतिशय योग्य आहे. विदर्भाच्या नावावर जोपर्यंत राजकीय शक्ती निर्माण होणार नाही तोपर्यंत विदर्भ मिळणार नाही.