शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश

By admin | Updated: September 10, 2016 05:01 IST

पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

मुंबई : पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा दिला जात असून, त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.मागील दोन-तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल शासनाने घेतली असून, पाण्याची आणि विजेची उपलब्धता असल्यामुळे कृषी फिडरवरील शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील कृषिप्राबल्य असलेल्या १६पैकी १३ परिमंडलांत कृषिग्राहकांना दरदिवशी १२ तास चक्राकार पद्धतीने थ्रीफेजची वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत महावितरणने क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना निर्देश दिले असून, त्यात तांत्रिक कारणांमुळे कुठे वीजपुरवठा करताना अडचणी आल्यास त्या तातडीने दूर करून १२ तास वीजपुरवठा मिळेल याची दक्षता घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)