शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची ताकद माझ्यासोबत

By admin | Updated: November 7, 2016 06:11 IST

निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे.

माणगाव (रायगड) : निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे. सत्ता कोणाचीही असो रायगडात विकास मी करतोय तो जनतेच्या आशीर्वादावरती, कारण जनतेची खरी ताकद माझ्याच सोबत आहे. कुणी कितीही राजकारण केले तरी माझ्या पाठीशी असणाऱ्या लोकांच्या ताकदीला हात लावण्याची हिंमत कोणामध्येच नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोणेरे येथे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेआयोजित पक्षप्रवेश व रायगड भूषण पुरस्कार विजेत्यांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संपर्क नेते प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष बाबूराव भोनकर, सभापती अलका केकाणे, राम टेंबे, राजिप सदस्या राधिका तटकरे आदी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या अण्णा उचाटे,घनश्याम घोसाळकर, मजीद लोखंडे व सत्यभामा ढेपे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोणरे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी टेंबे, सीमा जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते समाधान करकरे, शैलेश टेंबे, दर्शना टेंबे, बाळाराम टेंबे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा समाचार घेताना जनतेप्रति संवेदना नसलेला खासदार रायगडातून गेला अशी बोचरी टीका तटकरे यांनी केली. विकास आणि जनसेवा या सिद्धांतावर कधी आयुष्यात त्यांनी काम केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या जोडीचे मंत्रीपद केंद्रीय मंत्रिमंडळात मिळाले आहे,परंतु जनतेची सेवा करण्याची जाण त्यांना राहिली नाही. त्यांनी फक्त दुसऱ्यांवर टीका करूनच राजकारण करण्यात धन्यता मानली. त्यांना आगामी काळात जनताच धडा शिकवेल. सत्ता असली आणि नसली तरी लोकांची कामे होणारच यासाठी मी वचनबध्द असल्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले. (वार्ताहर)