शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपयश पचविण्याची ताकद हवी

By admin | Updated: December 25, 2015 03:19 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जीवनात यश मिळवायचे असेल, तर आधी अपयश पचविण्याची ताकद युवकांनी अंगी बाणवायला हवी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत ते म्हणाले की, ‘माणसाचा साधेपणा हा प्रचाराचा नव्हे, तर स्वभावाचा भाग व्हायला हवा,’ असे पर्रिकर यांनी यावेळी सुनावले. अभाविपमार्फत २४ ते २६ डिसेंबर दरम्यान, वांद्रे येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी पर्रिकर बोलत होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते. संयमाने ताकद वाढते, विनयाने धार चढते. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची अशी ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो. त्यामुळे आपणही आयुष्यभर विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहोत. आजच्या युगात विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अभाविप नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते स्व.अशोकजी शिंदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी अभाविपच्या कामाचे कौतुक करीत, अभाविपचे काम आजच्या काळात अपरिहार्य असल्याचे कुलगुरु म्हणाले.चांगले चारित्र्य आवश्यकचारित्र्याशिवाय विद्यासाधन व संपत्तीनिर्मिती शक्य नाही आणि आजवर भारतीय राज्यकर्त्यांनी नेमके याच विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या १५-२० वर्षांत महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण झाले. त्यातून डिग्री घेतल्यानंतर काय करायचे, याचा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला असल्याचे पर्रिकर म्हणाले. आज यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण कठोर मेहनत आणि जिद्द हे यशाचे प्रमुख अंग आहेत. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्यावर माहितीचा भडिमार होतो आहे. आज सर्वांनाच तत्काळ माहिती हवी असते, पण असे असले, तरी आपल्याला मिळालेल्या माहितीची उपयुक्तता आपण तपासणे आवश्यक आहे.