शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

अपयश पचविण्याची ताकद हवी

By admin | Updated: December 25, 2015 03:19 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जीवनात यश मिळवायचे असेल, तर आधी अपयश पचविण्याची ताकद युवकांनी अंगी बाणवायला हवी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत ते म्हणाले की, ‘माणसाचा साधेपणा हा प्रचाराचा नव्हे, तर स्वभावाचा भाग व्हायला हवा,’ असे पर्रिकर यांनी यावेळी सुनावले. अभाविपमार्फत २४ ते २६ डिसेंबर दरम्यान, वांद्रे येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी पर्रिकर बोलत होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते. संयमाने ताकद वाढते, विनयाने धार चढते. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची अशी ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो. त्यामुळे आपणही आयुष्यभर विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहोत. आजच्या युगात विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अभाविप नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते स्व.अशोकजी शिंदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी अभाविपच्या कामाचे कौतुक करीत, अभाविपचे काम आजच्या काळात अपरिहार्य असल्याचे कुलगुरु म्हणाले.चांगले चारित्र्य आवश्यकचारित्र्याशिवाय विद्यासाधन व संपत्तीनिर्मिती शक्य नाही आणि आजवर भारतीय राज्यकर्त्यांनी नेमके याच विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या १५-२० वर्षांत महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण झाले. त्यातून डिग्री घेतल्यानंतर काय करायचे, याचा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला असल्याचे पर्रिकर म्हणाले. आज यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण कठोर मेहनत आणि जिद्द हे यशाचे प्रमुख अंग आहेत. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्यावर माहितीचा भडिमार होतो आहे. आज सर्वांनाच तत्काळ माहिती हवी असते, पण असे असले, तरी आपल्याला मिळालेल्या माहितीची उपयुक्तता आपण तपासणे आवश्यक आहे.