शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

पंतप्रधान घडविण्याची ताकद उत्तर प्रदेशातच

By admin | Updated: September 11, 2015 03:04 IST

उत्तर प्रदेश ही केवळ देवादिकांचीच भूमी नाही, तर आजही देशाचा पंतप्रधान घडविण्याची ताकद याच राज्यात आहे, असे सांगतानाच आपल्या राज्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण न करण्याचे आवाहन

मुंबई : उत्तर प्रदेश ही केवळ देवादिकांचीच भूमी नाही, तर आजही देशाचा पंतप्रधान घडविण्याची ताकद याच राज्यात आहे, असे सांगतानाच आपल्या राज्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण न करण्याचे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज केले. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित यूपी कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. आपल्या राज्याची प्रतिमा आता बदलली असून, राज्य विकासाकडे जात आहे. हे पाहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी आपण राज्यात या, असे आवाहन त्यांनी केले. वस्तू आणि सेवा क्षेत्राचे सर्वांत मोठे मार्केट आपलेच राज्य आहे. गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण आहे. गुन्हेगारीबद्दल जेवढे बाहेर बोलले जाते तसे काहीही आमच्याकडे नाही. आपल्या सरकारने अनेक स्मार्ट सिटींच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये राज्यात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येऊ घातली आहे. ‘यूपी कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून ५० हजार कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यात येईल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील अनेक लोक परराज्यात रोजगारासाठी स्थलांतरित का होतात, या पत्रकारांच्या प्रश्नात अखिलेश यादव हसत म्हणाले की, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (राम नाईक) महाराष्ट्रातून आमच्याकडे आलेले आहेत. असे बोललो म्हणून माझ्याविरुद्ध काही केस तर होणार नाही ना? (विशेष प्रतिनिधी)अखिलेश यादव आलेअन् निराश करून गेलेअखिलेश यादव हे गुरुवारी मुंबईत आले. उद्योगपती आणि व्हीआयपींशी त्यांनी संवाद साधत आपल्या राज्यात गुंतवणुकीचे आव्हान केले; पण समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी निराशा केली. प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांचा साधा उल्लेखही कुठे केला नाही. या प्रकाराने नाराज झालेले अबू आझमी छोट्या यादवांना निरोप देण्यासाठी विमानतळावर गेले नाहीत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित, ‘यूपी कॉन्क्लेव्ह’मध्ये त्यांनी भाषण दिले. या हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सपाच्या प्रदेश कार्यालयातही ते गेले नाहीत. नंतर आयोजित पत्रपरिषदेत अखिलेश यादव केवळ पाच मिनिटे बोलले. तीन-चार प्रश्नांना उत्तरे देऊन ते अचानक उठून निघून गेले. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्नकरीत पत्रकारांना काही माहिती दिली.