शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

खड्ड्यांचे तंत्रज्ञानही गेले खड्ड्यात

By admin | Updated: August 2, 2016 02:11 IST

मुंबईकरांची खड्ड्यातून सुटका करण्याचा दावा करणारे तंत्रज्ञान, मुंबईच्या रस्त्यांवर वापर होण्याआधीच खड्ड्यात गेले आहे.

मुंबई: मुंबईकरांची खड्ड्यातून सुटका करण्याचा दावा करणारे तंत्रज्ञान, मुंबईच्या रस्त्यांवर वापर होण्याआधीच खड्ड्यात गेले आहे. नागपूरस्थित या कंपनीने खड्डे दुरुस्तीची जबाबदारी उचलली होती. मात्र, ऐनवेळी या कंपनीने आता माघार घेतली आहे. त्यामुळे पालिका तोंडघशी पडली आहे. दरवर्षी मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले की, मुसळधार पावसाला दोष देण्यात येत होता. या वर्षी रस्ते घोटाळा उघड झाल्याने, पालिकेचे पितळ उघडे पडले आहे. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असून, उच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिका प्रशासनाने नागपूरस्थित कंपनीला संधी देऊन, मुंबईला खड्डेमुक्त करण्याची तयारी केली होती. टेक्नॉलॉजीच्या भरवशावर दोन आठवड्यांत मुंबईतील खड्डे बुजतील, असा दावा पालिकेने केला आहे. तयार मिश्रण सामान्य तापमानातही खड्ड्यांमध्ये ओतल्यास २० मिनिटांत खड्डे भरतात आणि वाहतुकीला हा मार्ग खुला होऊ शकतो, असा दावा नागपूरच्या कंपनीने केला होता. मात्र, पालिकेने त्यांना संधी देताना आधी प्रयोग करून दाखवा. मग कंत्राट देऊन अशी भूमिका घेतल्याने या कंपनीने स्पर्धेत येण्यापूर्वीच माघार घेतल्याचे समजते. >कंपनीचा नकारपालिका आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, संबंधित कंपनीने खड्डे भरून दाखवण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवल्यास रस्ते विभागाने कळवावे. मात्र, ५० हजार रुपयांचे काम करण्यास या कंपनीने नकार देत, किमान ३ लाखांचे काम सांगा, अशी अट घातली आहे.>आणखी तीन प्रयोग : भरवशाच्या कंपनीने अशी माघार घेतल्यामुळे, तोंडघशी पडलेल्या पालिकेने अन्य तीन कंपन्यांना संधी द्यायचे असे ठरवले आहे. इको ग्रीन, शालिमार आणि एआर थर्माे या तीन कंपन्यांना शहर अथवा उपनगरात खड्डे भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, याचा प्रभाव कळण्यास एक आठवडा लागेल. >दोन हजार खड्डे?पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आत्तापर्यंत दोन हजार खड्डे पडले आहेत. प्रत्यक्षात मात्र ही संख्या कैकपटीने अधिक आहे.