शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

विदेशातून येणार बटाटे !

By admin | Updated: October 27, 2014 00:34 IST

सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने

नागपूर : सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. कळमना येथील कांदे-बटाटे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, वाढत्या किमतीवर नियंत्रण आणि घरगुती उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने पहिल्यांदा बटाटे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी उत्पादनाचा अंदाज वर्तविल्याने गेल्या १५ दिवसांपासून किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार किंमत प्रति किलो ३५ ते ४० रुपयांवर पोहोचली आहे. सध्या बाजारात जुना स्टॉक विक्रीसाठी येत आहेत. कानपूर आणि आग्रा येथे मालाचा शॉर्टेज आहे. या ठिकाणातून नवीन मालाची आवक येण्यास पुन्हा दोन ते अडीच महिने लागतील. कर्नाटकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केच उत्पादन आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला. स्टोरेजमधील माल संपत आहे. बाजारात उपलब्धता वाढविण्यासाठी आयात हाच एकमेव मार्ग असल्याचे सरकारचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये पहिली खेप येईल. बटाट्याची आयात युरोप आणि पाकिस्तानातून केली जाईल. जानेवारीपर्यंत पर्याप्त साठा करण्यासाठी आयातीचा निर्णय आहे. बटाट्यावर अवलंबून असलेल्या उद्योजकांनाही आयात करण्यास सांगितले आहे. घरगुती उपलब्धता वाढविणे आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने जूनमध्ये निर्यातीवर ४५० डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले आहे. सध्या बटाट्यावर ३० टक्के आयात शुल्क आहे. कळमना बाजारात दररोज १८ ते २० ट्रक बटाटे येत आहेत. या बाजारपेठेतून संपूर्ण विदर्भात माल विक्रीस जातो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव वाढल्याचे वसानी यांनी सांगितले. किरकोळमध्ये कांदे २५ रुपयेयंदाच्या दिवाळीत किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे कांदे २५ रुपयांवर पोहोचले आहे. कळमना बाजारात आंध्र प्रदेश, कनार्टक आणि धुळे (महाराष्ट्र) येथून कांद्याची आवक आहे. या भागात चांगला पाऊस झाल्याने उत्पादन वाढले आहे. ठोकमध्ये चांगला कांदा २० रुपये तर हलका कांदा १५ ते १७ रुपये किलो आहे. नाशिक परिसरातून नोव्हेंबर अखेरीस कांदा येईल, शिवाय आकोट, परतवाडा येथील पांढरा कांदा आणि मलकापूर, नांदुरा, शेगाव येथील लाल कांदा मार्चमध्ये येईल. कळमना बाजारात आवक कमी असून लाल कांदे १२ ते १५ ट्रक आणि पांढरे कांदे ४ ते ५ ट्रक येत आहेत.