शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून येणार बटाटे !

By admin | Updated: October 27, 2014 00:34 IST

सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने

नागपूर : सर्वत्र दिवाळी साजरी केली जात असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. किरकोळ बाजारात १०० रुपये किलो सांभार आणि ६० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. कळमना येथील कांदे-बटाटे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, वाढत्या किमतीवर नियंत्रण आणि घरगुती उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने पहिल्यांदा बटाटे आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी उत्पादनाचा अंदाज वर्तविल्याने गेल्या १५ दिवसांपासून किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार किंमत प्रति किलो ३५ ते ४० रुपयांवर पोहोचली आहे. सध्या बाजारात जुना स्टॉक विक्रीसाठी येत आहेत. कानपूर आणि आग्रा येथे मालाचा शॉर्टेज आहे. या ठिकाणातून नवीन मालाची आवक येण्यास पुन्हा दोन ते अडीच महिने लागतील. कर्नाटकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केच उत्पादन आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला. स्टोरेजमधील माल संपत आहे. बाजारात उपलब्धता वाढविण्यासाठी आयात हाच एकमेव मार्ग असल्याचे सरकारचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये पहिली खेप येईल. बटाट्याची आयात युरोप आणि पाकिस्तानातून केली जाईल. जानेवारीपर्यंत पर्याप्त साठा करण्यासाठी आयातीचा निर्णय आहे. बटाट्यावर अवलंबून असलेल्या उद्योजकांनाही आयात करण्यास सांगितले आहे. घरगुती उपलब्धता वाढविणे आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने जूनमध्ये निर्यातीवर ४५० डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले आहे. सध्या बटाट्यावर ३० टक्के आयात शुल्क आहे. कळमना बाजारात दररोज १८ ते २० ट्रक बटाटे येत आहेत. या बाजारपेठेतून संपूर्ण विदर्भात माल विक्रीस जातो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव वाढल्याचे वसानी यांनी सांगितले. किरकोळमध्ये कांदे २५ रुपयेयंदाच्या दिवाळीत किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे कांदे २५ रुपयांवर पोहोचले आहे. कळमना बाजारात आंध्र प्रदेश, कनार्टक आणि धुळे (महाराष्ट्र) येथून कांद्याची आवक आहे. या भागात चांगला पाऊस झाल्याने उत्पादन वाढले आहे. ठोकमध्ये चांगला कांदा २० रुपये तर हलका कांदा १५ ते १७ रुपये किलो आहे. नाशिक परिसरातून नोव्हेंबर अखेरीस कांदा येईल, शिवाय आकोट, परतवाडा येथील पांढरा कांदा आणि मलकापूर, नांदुरा, शेगाव येथील लाल कांदा मार्चमध्ये येईल. कळमना बाजारात आवक कमी असून लाल कांदे १२ ते १५ ट्रक आणि पांढरे कांदे ४ ते ५ ट्रक येत आहेत.