शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकापासून पोस्टमन भरतीला मुहूर्तच नाही!

By admin | Updated: July 8, 2014 21:55 IST

सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती.

वाशिम: सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती. तेव्हापासून भरती बंद करण्यात आली. उलट पाचव्या वेतन आयोगात पोस्टमनसह १0 टक्के कर्मचार्‍यांची कपात करण्यात आलीजागतिकीकरण, बाजारीकरण तथा शहरीकरणाच्या स्पर्धेत अस्तित्व टिकविण्यासाठी पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा डांगोरा पिटणार्‍या टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही. परिणामी टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमनची संख्या कमालीची रोडावली. सन २0११ मध्ये राज्यभरात २७६७१ ्रपोस्टमन कार्यरत होते. मात्र सन २0१३- २0१४ मध्ये ही संख्या २0 हजार ५0४ पर्यत घटली आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून दळणवळणाच्या क्षेत्रात पोस्टाची मक्तेदारी राहिली आहे. काही वर्षापर्यंत पोस्टाच्या सेवेशिवाय संपर्काचे साधन नव्हते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निरोप, खुशाली, नोकरीविषयक पत्रे तसेच अन्य महत्वपूर्ण कागदपत्रासाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या सात-आठ वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे पोस्टाशिवाय अन्य माध्यमातूनही जनतेला विविध प्रकारच्या सेवासुविधा मिळू लागल्या आहेत. याचा विपरित परिणाम पोस्टावर होऊ लागला आहे. पोस्टाची होणारी अधोगती थांबविण्यासाठी टपाल विभागाने प्रोजेक्ट अँरो सारख्या विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यातून पोस्ट कार्यालयांचे आधुनिकरण करण्यात आले आहे.परंतु आधुनिकरण करीत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनकडे या विभागाचे सपशेल दुर्लक्षच झाले आहे. सन २0११- १२ मध्ये राज्यभरात तब्बल २७ हजार ६७२ पोस्टमन होते. यामध्ये २0 हजार ३८५ ग्रामिण भागात तर ७२८६ शहरी भागात कार्यरत होते. सन २0१२- २0१३ मध्ये पोस्टमॅनची ही संख्या घटून २७ हजार २५४ झाली. यामध्ये शहरी भागातील ६२५५ तर ग्रामिण भागातील २0 हजार ९९९ पोस्टमॅनचा समावेश होता. सन २0१३ - २0१४ मध्ये ही संख्या पुन्हा घटली. आजमितीला शहरी भागात ५९६0 तर ग्रामिण भागात २0 हजार ५0४ पोस्टमॅन कार्यरत आहेत.