शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुकीची शक्यता - चव्हाण

By admin | Updated: April 8, 2015 02:18 IST

गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे.

मुंबई : गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे. त्यामुळे आपापसांतील मतभेदामुळे ते कोसळून केव्हाही मुदतपूर्व विधानसभा निवडणूक लागू शकते, असे भाकित वर्तवून वांद्रे (प.) पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन कॉंग्रेसच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षासाठी पूर्ण वेळ देत पुनर्बांधणी करण्याचे आपण ठरवले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी संघटनात्मक बदलाची गरज आहे, तेथे योग्य व सक्षम कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. त्या जिल्ह्णात जाऊन तेथील पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांची मते आजमाविली जातील. चार महिन्यांत त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ते बदल केले जातील. ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवित केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाचे खरे रूप जनतेला कळू लागले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांत एकही निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा झालेला नाही. त्यामुळे सरकारविषयी नाराजी वाढत आहे, असा दावाही त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ते म्हणाले, सध्या ते द्विधा मन:स्थितीत आहेत. कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका घेतात, त्यामागची नेमकी कारणे त्यांनाच माहीत असतील. नवी मुंबई, औरंगाबादमध्ये तर राष्ट्रवादीशी आघाडी न करता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहोत.