शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

मध्यावधी निवडणुकीची शक्यता - चव्हाण

By admin | Updated: April 8, 2015 02:18 IST

गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे.

मुंबई : गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे. त्यामुळे आपापसांतील मतभेदामुळे ते कोसळून केव्हाही मुदतपूर्व विधानसभा निवडणूक लागू शकते, असे भाकित वर्तवून वांद्रे (प.) पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन कॉंग्रेसच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षासाठी पूर्ण वेळ देत पुनर्बांधणी करण्याचे आपण ठरवले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी संघटनात्मक बदलाची गरज आहे, तेथे योग्य व सक्षम कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे. त्या जिल्ह्णात जाऊन तेथील पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांची मते आजमाविली जातील. चार महिन्यांत त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ते बदल केले जातील. ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवित केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाचे खरे रूप जनतेला कळू लागले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांत एकही निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा झालेला नाही. त्यामुळे सरकारविषयी नाराजी वाढत आहे, असा दावाही त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ते म्हणाले, सध्या ते द्विधा मन:स्थितीत आहेत. कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका घेतात, त्यामागची नेमकी कारणे त्यांनाच माहीत असतील. नवी मुंबई, औरंगाबादमध्ये तर राष्ट्रवादीशी आघाडी न करता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहोत.