शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

होळीमुळे पर्यटकांचा बेरंग

By admin | Updated: February 25, 2015 02:07 IST

पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळ्या उपाययोजना आखत असले, तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येऊ पाहणा-या देशी-विदेशी पर्यटकांना यंत्रणेच्या गाफीलपणाचा

गोपालकृष्ण मांडवकर, चंद्रपूरपर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळ्या उपाययोजना आखत असले, तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येऊ पाहणा-या देशी-विदेशी पर्यटकांना यंत्रणेच्या गाफीलपणाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. ५ आणि ६ मार्चला येथील पर्यटनासाठी देशी-विदेशी पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले आहे. मात्र, होळीनिमित्त ताडोबा बंद ठेवण्याचे कारण पुढे करून ऐनवेळी हे सर्व आरक्षण रद्द करण्याचे आदेश निघाले आहेत. दरवर्षी होळीनिमित्त ताडोबा अभयारण्यातील पर्यटन बंद असते. मात्र, यंदा तशी कुठलीही आगाऊ सूचना देण्यात न आल्याने पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्चला ९३, तर ६ मार्चला ६३ अशा एकूण १५६ वाहनांचे आरक्षण झाले आहे. ताडोबा व्याघ्र उद्यानातील भ्रमंतीच्या या आरक्षणासोबतच या परिसरातील रिसॉर्टस् आणि जिप्सी वाहनेही पर्यटकांकडून आरक्षित करण्यात आली आहेत. अगदी कालपरवापर्यंत हे आॅनलाईन आरक्षण सुरू होते. परंतु ही चूक लक्षात येताच नागपुरातील प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालयाने ५ आणि ६ मार्चला होळी आणि धुलीवंदन असल्याचे कारण पुढे करून हे दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश काढले. मात्र,तोपर्यंत १५६ वाहनांचे आरक्षण होऊन गेले होते. ही बाब लक्षात आल्यावर वेबसाईटवरील या दोन दिवसांचे आरक्षण ब्लॉक करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट चालविणाऱ्या यंत्रणेकडून हा घोळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाच्या डाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची जबाबदारी महाराष्ट्र आॅनलाईनकडे आहे. दरवर्षी होळीच्या तारखा बदलत असतात. मात्र, या वर्षी तारखांमध्ये दुरूस्ती न झाल्याने हा घोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी ही बाब लक्षात येताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव महाराष्ट्र) यांच्या नागपुरातील कार्यालयाकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपुरातील क्षेत्रीय संचालकांच्या कार्यालयाला सूचना देण्यात आली. त्यानंतर आॅनलाईन बुकिंग थांबविण्यात आले.आरक्षण करणाऱ्या पर्यटकांमध्ये बहुतांश परदेशी नागरिक असल्याने पेच निर्माण झाला आहे. वनविभाग आणि महाआॅनलाईन यांच्यामध्ये समन्वय नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले़