शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

होळीमुळे पर्यटकांचा बेरंग

By admin | Updated: February 25, 2015 02:07 IST

पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळ्या उपाययोजना आखत असले, तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येऊ पाहणा-या देशी-विदेशी पर्यटकांना यंत्रणेच्या गाफीलपणाचा

गोपालकृष्ण मांडवकर, चंद्रपूरपर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार एकीकडे वेगवेगळ्या उपाययोजना आखत असले, तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येऊ पाहणा-या देशी-विदेशी पर्यटकांना यंत्रणेच्या गाफीलपणाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. ५ आणि ६ मार्चला येथील पर्यटनासाठी देशी-विदेशी पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले आहे. मात्र, होळीनिमित्त ताडोबा बंद ठेवण्याचे कारण पुढे करून ऐनवेळी हे सर्व आरक्षण रद्द करण्याचे आदेश निघाले आहेत. दरवर्षी होळीनिमित्त ताडोबा अभयारण्यातील पर्यटन बंद असते. मात्र, यंदा तशी कुठलीही आगाऊ सूचना देण्यात न आल्याने पर्यटकांनी आॅनलाईन आरक्षण केले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्चला ९३, तर ६ मार्चला ६३ अशा एकूण १५६ वाहनांचे आरक्षण झाले आहे. ताडोबा व्याघ्र उद्यानातील भ्रमंतीच्या या आरक्षणासोबतच या परिसरातील रिसॉर्टस् आणि जिप्सी वाहनेही पर्यटकांकडून आरक्षित करण्यात आली आहेत. अगदी कालपरवापर्यंत हे आॅनलाईन आरक्षण सुरू होते. परंतु ही चूक लक्षात येताच नागपुरातील प्रधान मुख्य वन संरक्षण कार्यालयाने ५ आणि ६ मार्चला होळी आणि धुलीवंदन असल्याचे कारण पुढे करून हे दोन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश काढले. मात्र,तोपर्यंत १५६ वाहनांचे आरक्षण होऊन गेले होते. ही बाब लक्षात आल्यावर वेबसाईटवरील या दोन दिवसांचे आरक्षण ब्लॉक करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट चालविणाऱ्या यंत्रणेकडून हा घोळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पाच्या डाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची जबाबदारी महाराष्ट्र आॅनलाईनकडे आहे. दरवर्षी होळीच्या तारखा बदलत असतात. मात्र, या वर्षी तारखांमध्ये दुरूस्ती न झाल्याने हा घोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसांपूर्वी ही बाब लक्षात येताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव महाराष्ट्र) यांच्या नागपुरातील कार्यालयाकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपुरातील क्षेत्रीय संचालकांच्या कार्यालयाला सूचना देण्यात आली. त्यानंतर आॅनलाईन बुकिंग थांबविण्यात आले.आरक्षण करणाऱ्या पर्यटकांमध्ये बहुतांश परदेशी नागरिक असल्याने पेच निर्माण झाला आहे. वनविभाग आणि महाआॅनलाईन यांच्यामध्ये समन्वय नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले़