शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्रातील लोकप्रिय वळूची एक्झिट

By admin | Updated: June 25, 2017 20:48 IST

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली.

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 25 - संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली. उमेश कुलकर्णी यांच्या वळू चित्रपटातून या मूक अभिनेत्याने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल केली होती. सांगलीतील पांजरपोळमध्ये वास्तव्यास असलेल्या या तीनशे किलो वजनाच्या वळूचे निधन झाल्यानंतर अनेकजण हळहळले. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या २००८ मधील वळू चित्रपटाचा हा खराखुरा नायक प्रत्यक्षात खलनायकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रात लोकप्रिय झाला होता. राज्य व राष्ट्रीय विविध संस्थांचे पुरस्कारही त्याने पदरात टाकले. तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, दहशत बसावी अशी जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील पांजरपोळातील. चित्रपटासाठी पाहिलेल्या तब्बल तीनशे वळूंमधून सांगलीच्या या वळूची निवड दिग्दर्शकाने केली होती. सांगलीचा हा गुणी मूक कलाकार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने खाणे-पिणे सोडले होते. त्यामुळे तीनशे किलोवरून त्याचे वजन दोनशे किलोपर्यंत घटले होते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. वजन जास्त असल्याने तसेच तो वृद्ध झाल्याने उपचारास साथ मिळत नव्हती. अखेर रविवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती येथील डॉ. उद्धव धायगुडे यांनी दिली. पांजरपोळ संस्थेचे अक्षय भोसले यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा वळू आमच्याकडे होता. स्वभावाने शांत व खाण्यात अव्वल होता. दिसायला तो अत्यंत देखणा होता. रविवारी सकाळी त्याचे निधन झाल्यानंतर संस्थेचे सर्व संचालक त्याला पाहण्यासाठी आले होते. संस्थेच्याच जुना बुधगाव रस्त्यावरील मळ्यामध्ये त्याचे दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्यावतीने वळूला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे प्रमोद पाटील, रामचंद्र मोहिते, रमेश राजमाने, माधवदास शेठजी, राधेश्याम बजाज, शशिकांत आवटी, तात्यासाहेब तामगावे आदी उपस्थित होते. वळू चित्रपटाबद्दल दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, चित्रपटासाठी तब्बल तीनशेंवर वळू फिरून पाहिले. हा वळू मात्र शांत-सुस्वभावी निघाला. त्याने आम्हाला खूप चांगले सहकार्य दिले. त्याची एकच सवय होती. गाय दिसली की तो उधळायचा. चित्रीकरणादरम्यानही अशा घटना त्याच्याबाबतीत घडल्या होत्या.