शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये तहसिलवर शेकापचा मूक मोर्चा

By admin | Updated: October 28, 2014 22:55 IST

जवखेडे, खालसा येथे झालेल्या संजय जाधव, जयo्री जाधव, सुनील जाधव यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल : अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडे, खालसा येथे झालेल्या संजय जाधव, जयo्री जाधव, सुनील जाधव यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे मंगळवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक पाटील यांनी या दुर्दैवी घटनेचा तीव शब्दात निषेध केला.
शाहू, फुले, आंबेडकर यांनी महाराष्ट्राला सामाजिक वारसा दिला. पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणो हे निषेधार्ह आहे. आमच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या कार्यकत्र्याना या घटना क्लेशदायक वाटत आहेत. या घटनेचा निषेध केवळ दलित संघटना करीत आहेत, परंतु सर्व जाती-धर्माच्या जनतेने अशा घटनांविरोधी भूमिका घेणो आवश्यक असल्याचे मत विवेक पाटील यांनी व्यक्त केले.
या हत्याकांडाच्या तपासात गती नाही, याबाबत विवेक पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाची भीती, जरब शिल्लक नसल्याने अशा घटना वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नगर जिल्हा अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा, तसेच जलदगती न्यायालयात या हत्याकांडाचा तपास चालवून गुन्हेगारांना कठोरातील कठोर अशी शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी विवेक पाटील यांनी केली. 
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयातून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाने काढलेल्या या मोर्चामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणो सहभाग घेतला. या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
कर्नाळा सर्कल मार्गे, जय भारत नाका, नगरपालिका येथून पनवेल तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पनवेलचे नायब तहसीलदार म्हात्रे यांना यावेळी शेकापकडून निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण  घरत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन व विकास महासंघाचे अध्यक्ष बा.रा.सदावर्ते यांच्यासह 
शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने यात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
 
बौद्ध समाजाकडून निषेध
दासगांव : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबाची क्रूर हत्या करण्यात आली. या हत्येचा महाड तालुक्यातील बौद्ध समाजातील विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी, अशा मागणीचे निवेदन महाड प्रांताधिका:यांना सादर केले.
जाधव कुटुंबाची हत्या होवून आठ दिवस उलटून गेले तरी आरोपींचा शोध लावण्यास अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दलितमित्र मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक बैठक घेण्यात आली. महाडमधील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांनी, प्रतिनिधींनी या घटनेचा निषेध केला.
यावेळी महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे राज्यपालांना सादर करावयाचे निवेदनही दिले. याप्रसंगी मधुकर गायकवाड, मुकुंद पाटणो, सखाराम सकपाळ, विनायक हाटे, प्रभाकर खांबे, संतोष पवार, शंकर साळवी, केरु गायकवाड, मुकाराम माने, दीपक मोरे, कुंदन हाटे, अशोक मोरे, राजेंद्र निकम, भूपेंद्र सवादकर, महेंद्र शिर्के, विठोबा घाडगे आदि उपस्थित होते. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. (वार्ताहर)