शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रुग्णांच्या दुर्दशेला सरकार जबाबदार

By admin | Updated: January 8, 2016 02:46 IST

राज्य सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे;

मुंबई : राज्य सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे; शिवाय तेथील रुग्णालयात वैद्यकीय सेवांची वानवा आहे, असे म्हणत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने राज्य सरकारवर ताशेरे ओढले; शिवाय नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला २ लाखांचा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डॉक्टरला १ लाखाचा तर अकोला आणि नंदुरबारमधील आदिवासी पाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि जनस्वास्थ्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स येथील कन्व्हेन्शन सभागृहात आयोजित ‘राईट टू हेल्थ केअर’ या कार्यक्रमात आयोगाने ही माहिती दिली. आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीत महाराष्ट्रासाठी न्यायमूर्ती सिरियाक जोसेफ, राजस्थानमधील खटल्यांसाठी एस.टी. सिन्हा आणि गुजरातसाठी न्यायमूर्ती डी. मुरुगेसन यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात जननी शिशू योजनेची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती सिरियाक जोसेफ यांनी या वेळी मांडले. नंदुरबार जिल्ह्यातील अपघातग्रस्त सुरेश नाईक या तरुणाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. त्याला २ लाखांची भरपाई, सरकारकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि कृत्रिम पायाची व्यवस्था करण्याचे आदेश आयोगाने संबंधित डॉक्टरला दिले आहेत.पुण्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शीतल बनकर गरोदर असताना तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यांची तपासणी करून एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल देण्यात आला. त्यांना १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.अकोल्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने स्वाती वाघूरकर यांचे नवजात अर्भक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने दगावले. आयोगाने त्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यास सांगितले. (प्रतिनिधी)