शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आरोग्यसेवक बनणार गरीब रुग्णांचा आधार

By admin | Updated: October 17, 2016 00:52 IST

आरोग्य व्यवस्थेवर येत असणारा ताण लक्षात घेऊन गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, यासाठी धर्मादाय आयुक्तांनी सकारात्मक पाऊल टाकले

१५ नोव्हेंबरपासून राज्यात ७० केंद्रांवर एकाच वेळी खरेदी वर्धा : राज्यात कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. यामुळेच कापूस उत्पादकांना कापूस पणन महासंघाच्या खरेदीची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदीवर शासनाचा शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यात १५ नोव्हेंबरपासून एकाच वेळी ७० केंद्रावरून कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्याची माहिती कापूस पणन महासंघाच्यावतीने देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून कापूस निघणे सुरू झाले आहे. यंदाच्या हंगामात कापसाचे उत्पादन वाढणार असल्याने दर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा असते. याच कारणाने कापूस पणन महासंघाची खरेदी सुरू होण्याकडे कापूस उत्पादकांचे लक्ष लागले होते. यामुळे सर्वांच्या नजरा कापूस पणन महासंघाच्या खरेदीकडे लागल्या होत्या. कापूस पणन महासंघाच्यावतीने शासनाकडे कापूस खरेदीच्या परवानगीकरिता अर्ज केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसह कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षाची बैठक झाली. या बैठकीत खरेदीचा निर्णय झाला आहे. ही खरेदी येत्या १५ नोव्हेंबरपासून होणार असल्याचे या बैठकीत ठरले आहे.(प्रतिनिधी) यंदाही दिवाळीचा मुहूर्त हुकला कापूस खरेदीचा मुहूर्त दसरा किंवा दिवाळीच्या तोंडावर होत आला आहे. गत पाच वर्षांपासून मात्र दिवाळीचा मुहूर्त चूकतच आला आहे. यंदाही तो चुकला असून दिवाळीच्या नंतरच कापूस खरेदी होणार असल्याचे आता पक्के झाले आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची आमसभा झाली. या आमसभेत शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्या कापसाला किमान सहा हजार रुपये दर देण्यात यावा. तसे शक्य नसल्याने शासनाने शेतकऱ्यांना हमीभावावर येत असलेले दोन हजार रुपये बोनस अथवा इतर मार्गाने देण्याचा ठराव महासंघाच्या आमसभेत घेण्यात आला. कापूस पणन महासंघाला स्वतंत्र व्यवस्था द्यावी कापूस पणन महासंघ ही शासनाची एक यंत्रणा आहे. येथे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. शासनाने महासंघाची ही यंत्रणा कापूस खरेदीकरिता वापरायला मंजुरी द्यावी, असा ठरावही घेण्यात आला. तसेच २०१६-१७ या हंगामात कापूस पणन महसंघाला व्यापारी तत्त्वावर कापूस खरेदी करण्यात यावी अशी विनंती वजा मागणी शासनाला करण्यात आली आहे.