शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

तलाव सुशोभीकरण अत्यंत गरजेचे

By admin | Updated: June 11, 2016 03:40 IST

तलावाच्या सुशोभीकरणाकडे पूर्वीच्या मोखाडा ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष होते

मोखाडा : शहरातील एकमेव तलावाच्या सुशोभीकरणाकडे पूर्वीच्या मोखाडा ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष होते आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तसेच मोखाडा शहरात प्रवेश करतानाच प्रथम दृष्टिक्षेपात येणाऱ्या या तलावाभोवती आणि आतल्या बाजूने घाणीचे साम्राज्य तसेच तलावात प्रचंड गाळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मोखाडा शहर हद्दीतील टाकपाडा, घोसाळी, मोखाडा, तेलीपाडा आदी गावपाड्यांतील श्री गणेशाचे तसेच दुर्गामातेचे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी भावपूर्ण विसर्जन केले जाते. यामुळे हा तलाव भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी येथे दररोज गर्दी होत असते. यामुळे हा तलाव विरंगुळ्याचे ठिकाणसुद्धा बनलेला आहे. मात्र, या तलावाच्या अवतीभोवती असलेल्या घाणीचा उग्र वास सहन होत नसल्याने येथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तलावात साचलेला गाळ काढून साफसफाई ठेवली असती व सांडपाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले असते तर मोखाडावासीयांसाठी हे एक उत्तम विरंगुळा केंद्र ठरले असते. (वार्ताहर) >मत्स्य व्यवसायाची संधीतलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण करणे व स्वच्छ पाण्यात मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून नगरपंचायतीला हजारोंचे उत्पन्न मिळू शकते. -हिरालाल अहिरे मोखाडा तालुका, आरपीआय अध्यक्ष