शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तलाव सुशोभीकरण अत्यंत गरजेचे

By admin | Updated: June 11, 2016 03:40 IST

तलावाच्या सुशोभीकरणाकडे पूर्वीच्या मोखाडा ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष होते

मोखाडा : शहरातील एकमेव तलावाच्या सुशोभीकरणाकडे पूर्वीच्या मोखाडा ग्रामपंचायत आणि आताच्या नगरपंचायतीचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे कायम दुर्लक्ष होते आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तसेच मोखाडा शहरात प्रवेश करतानाच प्रथम दृष्टिक्षेपात येणाऱ्या या तलावाभोवती आणि आतल्या बाजूने घाणीचे साम्राज्य तसेच तलावात प्रचंड गाळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मोखाडा शहर हद्दीतील टाकपाडा, घोसाळी, मोखाडा, तेलीपाडा आदी गावपाड्यांतील श्री गणेशाचे तसेच दुर्गामातेचे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी भावपूर्ण विसर्जन केले जाते. यामुळे हा तलाव भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी येथे दररोज गर्दी होत असते. यामुळे हा तलाव विरंगुळ्याचे ठिकाणसुद्धा बनलेला आहे. मात्र, या तलावाच्या अवतीभोवती असलेल्या घाणीचा उग्र वास सहन होत नसल्याने येथे येणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन तलावात साचलेला गाळ काढून साफसफाई ठेवली असती व सांडपाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले असते तर मोखाडावासीयांसाठी हे एक उत्तम विरंगुळा केंद्र ठरले असते. (वार्ताहर) >मत्स्य व्यवसायाची संधीतलावातील गाळ काढून त्याचे सुशोभीकरण करणे व स्वच्छ पाण्यात मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून नगरपंचायतीला हजारोंचे उत्पन्न मिळू शकते. -हिरालाल अहिरे मोखाडा तालुका, आरपीआय अध्यक्ष