शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

राज्यातील सर्व नद्या प्रदूषणमुक्त करणार

By admin | Updated: July 26, 2016 02:53 IST

राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत

मुंबई : राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत तयार करून केंद्र सरकारकडे पाठविले जातील, अशी ग्वाही पर्यावणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले की, सर्वच नद्यांचे प्रदूषण वाढले असून ही चिंतेची बाब आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने त्यातील ५० टक्के निधी राज्य सरकारने खर्च करावा आणि ५० टक्के निधी केंद्र सरकारने द्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे.महानगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांकडून त्यांचे प्रस्ताव मागवून घेण्यात येतील. सर्व प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत केंद्र सरकारकडे पाठविले जातील, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदुषणामुळे राज्यात काही साखर कारखान्यांचे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्यावर एक महिन्याच्या आत परवाने मागणीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेतले जातील, असे कदम यांनी स्पष्ट केले.