शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

राज्यातील सर्व नद्या प्रदूषणमुक्त करणार

By admin | Updated: July 26, 2016 02:53 IST

राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत

मुंबई : राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत तयार करून केंद्र सरकारकडे पाठविले जातील, अशी ग्वाही पर्यावणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले की, सर्वच नद्यांचे प्रदूषण वाढले असून ही चिंतेची बाब आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने त्यातील ५० टक्के निधी राज्य सरकारने खर्च करावा आणि ५० टक्के निधी केंद्र सरकारने द्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे.महानगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांकडून त्यांचे प्रस्ताव मागवून घेण्यात येतील. सर्व प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत केंद्र सरकारकडे पाठविले जातील, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदुषणामुळे राज्यात काही साखर कारखान्यांचे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्यावर एक महिन्याच्या आत परवाने मागणीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेतले जातील, असे कदम यांनी स्पष्ट केले.