शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

राज्यातील सर्व नद्या प्रदूषणमुक्त करणार

By admin | Updated: July 26, 2016 02:53 IST

राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत

मुंबई : राज्यातील सर्वच नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्राधान्य दिले असून त्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के निधी हा केंद्र सरकारने द्यावा आणि त्याबाबतचे प्रस्ताव दोन महिन्यांत तयार करून केंद्र सरकारकडे पाठविले जातील, अशी ग्वाही पर्यावणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले की, सर्वच नद्यांचे प्रदूषण वाढले असून ही चिंतेची बाब आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येणारा खर्च मोठा असल्याने त्यातील ५० टक्के निधी राज्य सरकारने खर्च करावा आणि ५० टक्के निधी केंद्र सरकारने द्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे.महानगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांकडून त्यांचे प्रस्ताव मागवून घेण्यात येतील. सर्व प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत केंद्र सरकारकडे पाठविले जातील, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदुषणामुळे राज्यात काही साखर कारखान्यांचे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत, त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्यावर एक महिन्याच्या आत परवाने मागणीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेतले जातील, असे कदम यांनी स्पष्ट केले.