शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सोलापुरात मतदारांचा कौल परिवर्तनाला!

By admin | Updated: February 26, 2017 01:31 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौल देऊन जे परिवर्तनाचे वारे वाहायला लागले ते आता स्थानिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहे, हे सोलापूर महापालिकेच्या निकालावरूनही सिद्ध झाले.

- रवींद्र देशमुख, सोलापूर

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौल देऊन जे परिवर्तनाचे वारे वाहायला लागले ते आता स्थानिक पातळीपर्यंत पोहोचलेले आहे, हे सोलापूर महापालिकेच्या निकालावरूनही सिद्ध झाले. भाजपाने विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख या मंत्रीद्वयींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली खरी; पण परिवर्तनाचे हे वारेच पक्षाला सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेले. १०२ सदस्यांच्या सभागृहात ४९ जागा जिंकून भाजपा मॅजिक फिगर ५२च्या अगदी जवळ पोहोचली आहे. सत्ता स्थापनेसाठी केवळ तीन जागांची भाजपाला गरज आहे. परिवर्तनाच्या लाटेत काँग्रेसचा प्रभावी प्रचार कुचकामी ठरला. ‘एमआयएम’ने मात्र ९ जागा जिंकत ‘इंद्रभुवना’त लक्षवेधी प्रवेश केला आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर प्रभावी प्रचार केला. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या मोठ्या प्रचारसभा झाल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठ-दहा दिवस मुक्काम करून सोलापूर पिंजून काढले. काँग्रेसने केलेल्या कामांची यादी मतदारांपुढे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवातीपासूनच पराभूत मानसिकता होती. त्यांना सर्व १०२ उमेदवारही मिळाले नाहीत.शिवसेना महेश कोठे आणि पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली लढली. ‘कोठे फॅक्टर’मुळे पक्षाच्या जागा ९वरून २१पर्यंत गेल्या. ‘एमआयएम’ने मात्र आश्चर्यकारक यश मिळविले. ३२ वर्षांनंतर झालेले सत्तांतर खऱ्या अर्थाने मतदारांच्या परिवर्तनवादी मानसिकतेतूनच झाल्याचे स्पष्ट होते.सत्तेची समीकरणे कशी जुळणार?भाजपाला सत्तेसाठी तीन जागांची गरज आहे. सत्तेसाठी ते कोणते समीकरण मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकही अपक्ष निवडून आलेला नाही. राष्ट्रवादीने चार जागा जिंकलेल्या आहेत. ‘एमआयएम’ व भाजपा युतीची शक्यता व्यक्त करण्याचे धाडस कोणीही व्यक्त करीत नाही. या स्थितीत शिवसेना-भाजपा सत्तेसाठी एकत्र येतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.