शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जिल्ह्यात ३१ आॅगस्टपर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 02:17 IST

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे.

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात देखील ती ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी मंगळवारी दिली आहे.जिल्हाधिकारी तेली-उगले म्हणाल्या, या मोहिमेमध्ये नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे व नवीन मतदार संघात त्यांची नोंदणी करणे तसेच मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. मतदार याद्यांचे शुध्दीकरण करताना स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी विवाह नोंदवही, मृत मतदारांची नावे वगळण्याकरिता मृत्यू नोंदवही याची तपासणी करु न कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील माहिती पोलीस दलाकडून घेण्यात येणार आहे. स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी संबंधितांना संधी देऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात. नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी महाविद्यालयाच्या ठिकाणी शिबिर भरविण्यात येणार आहेत व सर्व अर्ज त्याच ठिकाणी भरु न घेण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी ५४ हजार नवीन मतदारांची नावनोंदणी झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात येणाऱ्या ग्रामीण आणि नागरी भागातील निवडणुकांमध्ये या मतदार यादीचा वापर करण्यात येणार आहे.पात्र मतदारांची मतदार यादीत नोंदणी करणे, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे आदी सर्व माहितीसह अद्ययावत व बिनचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. >२० लाख ४० हजार ३४६ मतदाररायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्रे २ हजार ४९३ आहेत. मतदार एकूण २० लाख ४० हजार ३४६ असून त्यामध्ये पुरु ष मतदार १० लाख ४२ हजार ९७९ तर स्त्री मतदार ९ लाख ९७ हजार ३६७ आहेत. मतदार यादीत ९३.६५ टक्के मतदारांचे फोटो आहे. मतदार ओळखपत्र टक्केवारी ९४.७९ आहे. नवीन मतदान केंद्र करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या जागा शोधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ३१ आॅगस्टनंतर या मतदार याद्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.