शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी आज मतदान

By admin | Updated: June 3, 2016 03:31 IST

ठाणे : ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता शुक्रवार, ३ जून रोजी मतदान होणार आहे

ठाणे : ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता शुक्रवार, ३ जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे हे पाचव्यांदा आपले नशीब आजमावत असून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. सात महापालिका, दोन नगरपालिका यामधील एकूण १०६० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एकूण १३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगाने कठोर उपाययोजना केल्या आहेत.डावखरे यांना काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला असल्याने त्यांच्याकडे ४२१ मते आहेत. शिवसेना, भाजपा यांची मिळून ४९१ मते आहेत. विजयी उमेदवाराला ५३१ मतांची मॅजिक फिगर गाठावी लागणार असल्याने मनसे, छोटे पक्ष व अपक्ष यांच्या १०८ मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मते फुटू नयेत, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीने आपले नगरसेवक अलिबाग व लोणावळा येथे, तर शिवसेना-भाजपाने आपले नगरसेवक गोव्यात नेऊन ठेवले आहेत. सोमवार, ६ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय, व्हिडीओ चित्रीकरणासह सीसीटीव्हींची करडी नजर या केंद्रांवर असणार आहे.या निवडणुकीत ठाणे मतदान केंद्रावर सर्वाधिक १३३ जणांचे मतदान असून सर्वात कमी मतदान जव्हार, मुरबाड व शहापूर येथे प्रत्येकी १९ मतदारांचे आहे. (प्रतिनिधी)डावखरेंची ही शेवटची निवडणूक ठरणार - दानवेठाणे : ‘राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांची ही शेवटची निवडणूक आहे, हे आपल्यालाच त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे,’ असे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काढले. फाटक यांच्या प्रचारासाठी दानवे बुधवारी रात्री ठाण्यात आले होते. त्यांनी शिवसेना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या उमेदवाराला मते दिली नाहीत, तर राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा जो इशारा दिला आहे, तो गांभीर्याने घेण्याची आठवण दानवे यांनी करून दिली.