शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

साहाय्यक आयुक्तांच्या बदलीवरून राजकारण तापले

By admin | Updated: November 5, 2016 04:54 IST

एका भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही त्यांना राज्य सरकारने अभय दिले. त्याचवेळी मंत्रिपदावर असलेल्या एका भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आर-मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हीच संधी साधत शिवसेनेने विरोधी पक्षांच्या मदतीने भाजपाला लक्ष्य केले आहे. या अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक शनिवारी आर-मध्य विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहेत.बोरीवली येथील आर-मध्य विभागातील साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांची गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन (पूर्व उपनगरे) येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गांधी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांची बदली केली. त्यांचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असून, ते प्रामाणिक अधिकारी असल्याने त्यांच्या बदलीने नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याविरोधात मनसेचे नगरसेवक चेतन कदम, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, शुभा राऊळ, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीच्या संध्या दोषी, काँग्रेसचे शिवानंद शेट्टी यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन गांधी यांच्या बदलीबाबत विचारणा केली.या चर्चेत आयुक्तांनी गटनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. डोंगरी एक्सल येथील पालिकेच्या प्लॉटवरील अनधिकृत बांधकामावर गांधी यांनी कारवाई केल्यानेच भाजपाच्या एका नेत्याच्या दबावामुळे त्यांची बदली झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे. एका आमदाराच्या दबावामुळे कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतील तर हा त्यांचा मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे, असा टोला शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)