शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

क्रांती दिनाचेही राजकारण

By admin | Updated: August 10, 2016 04:29 IST

ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले

मुंबई : ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले. भाजपा कार्यकर्त्यांनी सकाळी नाना चौक ते आॅगस्ट क्रांती मैदान रॅली काढली. त्यावर ७४ वर्षांनी भाजपाला अचानक का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला. आॅगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस आणि भाजपाचा कार्यक्रम झाला. ‘चले जाव चळवळी’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आरंभानिमित्त मुंबई भाजपातर्फे रॅली काढण्यात आली, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आ. राज पुरोहित, योगेश सागर, अमित साटम, प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांच्यासह मुंबई भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.त्यावर ‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल करत या ऐतिहासिक आंदोलनाचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.अवमानाची तक्रारआॅगस्ट क्रांती मैदानावर यंदा भाजपाचा सरकारी कार्यक्रम आणि काँग्रेसचा कार्यक्रम, असे दोन कार्यक्रम झाले. मैदानातच त्यासाठी दोन व्यासपीठे उभारण्यात आली होती. काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत सुरूअसताना भाजपाच्या मंडपातील काही कार्यकर्ते उभे होते. तर काही जण बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला असून पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. ‘चले जाव-२’ म्हणायला हा सिनेमा आहे का - सावंत‘चले जाव चळवळ-२’ अशी बॅनरबाजी करणाऱ्या भाजपाला ही चळवळ म्हणजे बॉलिवूड सिनेमाचा सिक्वेल वाटला का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आॅगस्ट क्रांती मैदानाला भेट ही दिली नव्हती. आता का जाग आली, असे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. यंदा भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना स्वत:चे व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी केला. ‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला. आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती मैदानावरील स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यंदा प्रथमच भाजपाने क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर मोठा कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी काँग्रेसकडून या दिवसानिमित्त कार्यक्रम केला जातो. यंदा मात्र भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. केवळ या दिवसाचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकारण केले जात असल्याची टीका निरुपम यांनी केली.