शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

क्रांती दिनाचेही राजकारण

By admin | Updated: August 10, 2016 04:29 IST

ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले

मुंबई : ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले. भाजपा कार्यकर्त्यांनी सकाळी नाना चौक ते आॅगस्ट क्रांती मैदान रॅली काढली. त्यावर ७४ वर्षांनी भाजपाला अचानक का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला. आॅगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस आणि भाजपाचा कार्यक्रम झाला. ‘चले जाव चळवळी’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आरंभानिमित्त मुंबई भाजपातर्फे रॅली काढण्यात आली, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आ. राज पुरोहित, योगेश सागर, अमित साटम, प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांच्यासह मुंबई भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.त्यावर ‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल करत या ऐतिहासिक आंदोलनाचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.अवमानाची तक्रारआॅगस्ट क्रांती मैदानावर यंदा भाजपाचा सरकारी कार्यक्रम आणि काँग्रेसचा कार्यक्रम, असे दोन कार्यक्रम झाले. मैदानातच त्यासाठी दोन व्यासपीठे उभारण्यात आली होती. काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत सुरूअसताना भाजपाच्या मंडपातील काही कार्यकर्ते उभे होते. तर काही जण बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला असून पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी सांगितले. ‘चले जाव-२’ म्हणायला हा सिनेमा आहे का - सावंत‘चले जाव चळवळ-२’ अशी बॅनरबाजी करणाऱ्या भाजपाला ही चळवळ म्हणजे बॉलिवूड सिनेमाचा सिक्वेल वाटला का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आॅगस्ट क्रांती मैदानाला भेट ही दिली नव्हती. आता का जाग आली, असे ते म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. यंदा भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना स्वत:चे व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी केला. ‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला. आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती मैदानावरील स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यंदा प्रथमच भाजपाने क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर मोठा कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी काँग्रेसकडून या दिवसानिमित्त कार्यक्रम केला जातो. यंदा मात्र भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. केवळ या दिवसाचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकारण केले जात असल्याची टीका निरुपम यांनी केली.