शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इमारतींच्या पुनर्विकासावरून राजकारण

By admin | Updated: June 28, 2016 02:54 IST

कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींच्या मुद्यावर मनसेतर्फे २८ जूनला डोंबिवलीत चर्चासत्र होणार आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींच्या मुद्यावर मनसेतर्फे २८ जूनला डोंबिवलीत चर्चासत्र होणार आहे. मात्र, अन्य पक्षांनी धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर, असा काही कार्यक्रम घेण्यात पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे त्यांना या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही, असा दावा मनसेने केला आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींच्या प्रश्नी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक बोलावली आहे.मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले की, मागील वर्षी पावसाळ््यात ठाकुर्लीतील ‘मातृछाया’ ही इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, महापालिकेने धोकादायक इमारतींत राहणाऱ्यांचे पुनर्वसन करणे, ही महापालिकेची जबाबदारी नाही, असा पवित्रा घेतला. त्यावेळी मनसेने नागरिकांना मदतीचा हात दिला होता. आता पुन्हा धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. स्ट्रक्चरल आॅडिट म्हणजे काय, धोकादायक व अतिधोकादायक म्हणजे काय, महापालिकेची जबाबदारी काय, भाडेकरूंचे अधिकार काय, पुनर्विकासाचे धोरण नेमके काय आहे, या विविध प्रश्नांवर मनसे चर्चा घडवून आणणार आहे. आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवली शहरांना क्लस्टर योजना लागू केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर, भाजपा-शिवसेनेचे सरकार आले. या सरकारनेही आघाडी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत क्लस्टर योजना लागू करण्याचे केवळ आश्वासन दिले आहे. ‘स्मार्ट सिटी’चे गाजर दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी धोकादायक इमारतींमधील रहिवाशाांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करावा. जनहिताच्या प्रश्नाला मनसेने हात घातला असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी सांगितले.मनसेतर्फे चर्चासत्र होणार असले तरी दोन वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे यासंदर्भात उपोषण, मोर्चे आणि आंदोलन केले जात आहे. एका संस्थेच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली गेली आहे. भाकपानंतर मनसेने पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्या इमारती धोकादायक नाहीत, त्यांचा खोटा स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट तयार करून धोकादायक असल्याचे दाखवले जात आहे. धोकादायक इमारती मोक्याच्या जागी असल्याने त्यावर बिल्डरांचा डोळा आहे. भाडेकरूंना पिटाळून लावण्याचा हा डाव आहे. राष्ट्रवादीच्या गटनेत्या शाहीन जव्वाद डोण यांनी, शहरात धोकादायक इमारती वाढीस लागण्यास महापालिका जबाबदार आहे, असा आरोप केला. हा मुद्दा राष्ट्रवादीने यापूर्वीही लावून धरला होता. त्यांच्या पुनर्विकासाचे धोरण योग्य नसल्याने भाडेकरू, मालक आणि बिल्डर यांच्यात एकवाक्यता नाही. परिणामी, पक्षाने पाठपुरावा केला नाही, असा आरोप केला. सत्तेत २० वर्षांपासून शिवसेना-भाजपा आहे. त्यांनीच हा प्रश्न चिघळवल्याचा आरोप केला. शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी सांगितले की, धोकादायक इमारतींसंदर्भात महापालिका प्रशासनाची दिरंगाई आणि ढिलाई आहे. त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर येत्या आठवड्यात सर्व गटनेत्यांची बैठक घेतली जाणार आहे. नुकतीच शहरात स्मार्ट सिटी शिखर परिषद झाली. यावेळी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी उपस्थित केला. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही क्लस्टर योजनेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर व एसआरए योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याने भाजपाने यावर काहीएक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रहिवाशांना आणखी एक संधी देण्याची मागणी>चोळेगावातील भाजपा नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी, इमारती धोकादायक नसताना त्या धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटचे रिपोर्ट तयार केले जात आहेत, असा मुद्दा आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे उपस्थित केला आहे. चौधरी यांच्या प्रभागातील ‘शिवकृपा’ इमारतीत २५ कुटुंबे राहतात, तर ‘भगवान निवास’मध्ये ६० कुटुंबे राहतात. या दोन्ही इमारतींचे मालकाने स्ट्रक्चरल आॅडिट केले आहे. त्यात इमारत अतिधोकादायक, असे म्हटले आहे. पावसाळ्यात रहिवासी कुठे जाणार. त्यांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट थर्ड पार्टीकडून करावे. त्यांना आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली.