शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 03:39 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे. १३ आमदारांवरुन त्यांची संख्या एका आमदारावर आली.२००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची मते मिळवून १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांची राजकीय वाटचाल दमदार असेल, असे भाकित वर्तविले होते, पण राज यांनी उलटसुलट भूमिका घेत त्यांनी स्वत:बरोबर पक्षालाही चक्रव्युहात टाकले. मोदींबाबतच्या उलटसुलट विधानांनी युवावर्ग त्यांच्यापासून दूर गेला. उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूसही सध्या मोदींच्या प्रभावाखाली आहे. राज यांच्या ब्ल्यू प्रिंटचे या वर्गाला आकर्षण वाटेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्रात व राज्यात मोदी सरकार द्या हे पंतप्रधानांचे आवाहन अधिक प्रभावी ठरल्याने या वर्गाने मनसेच्या ब्ल्यू प्रिंटकडे पाठ फिरवली. मुंबईतील किमान १० विधानसभा मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपाला एकगठ्ठा मतदान केले आहे. मनसेने पक्ष स्थापनेच्या वेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मारहाण केली होती. त्या वर्गाला मोदींचा पर्याय समोर दिसल्यावर त्यांनी मनसेच्या दबावाला झुगारून मतदान केले आहे. घाटकोपर (प.) व मुलुंड या दोन मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का हा अमराठी लोकांपेक्षा अधिक आहे. त्या मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला याचा अर्थ मनसेने मराठी माणसांची घोर निराशा झाली आहे.राज यांच्या भूमिकांत व वर्तनात सातत्य नसल्याने त्यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असे जाणकारांचे मत आहे. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती बाहेर येण्यास नऊ वर्षे लागली. तोपर्यंत नाशिक महापालिकेत त्यांना सत्ता मिळाली, पण तेथेही त्यांनी प्रभावी काम करून दाखवता आले नाही. शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन झाल्याने लोकांपर्यंत ती पोहोचली नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्याबाबतही टोकाची भाषा राज यांनी केली होती. नाशिकमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यावर राज यांनी थेट त्याच भुजबळ यांच्याशी हातमिळवणी केली. राज अशा कोलांटउड्यांमुळे त्यांचा पक्ष गटांगळ्या खात राहिला. (प्रतिनिधी)