शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 03:39 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे. १३ आमदारांवरुन त्यांची संख्या एका आमदारावर आली.२००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची मते मिळवून १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांची राजकीय वाटचाल दमदार असेल, असे भाकित वर्तविले होते, पण राज यांनी उलटसुलट भूमिका घेत त्यांनी स्वत:बरोबर पक्षालाही चक्रव्युहात टाकले. मोदींबाबतच्या उलटसुलट विधानांनी युवावर्ग त्यांच्यापासून दूर गेला. उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूसही सध्या मोदींच्या प्रभावाखाली आहे. राज यांच्या ब्ल्यू प्रिंटचे या वर्गाला आकर्षण वाटेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्रात व राज्यात मोदी सरकार द्या हे पंतप्रधानांचे आवाहन अधिक प्रभावी ठरल्याने या वर्गाने मनसेच्या ब्ल्यू प्रिंटकडे पाठ फिरवली. मुंबईतील किमान १० विधानसभा मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपाला एकगठ्ठा मतदान केले आहे. मनसेने पक्ष स्थापनेच्या वेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मारहाण केली होती. त्या वर्गाला मोदींचा पर्याय समोर दिसल्यावर त्यांनी मनसेच्या दबावाला झुगारून मतदान केले आहे. घाटकोपर (प.) व मुलुंड या दोन मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का हा अमराठी लोकांपेक्षा अधिक आहे. त्या मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला याचा अर्थ मनसेने मराठी माणसांची घोर निराशा झाली आहे.राज यांच्या भूमिकांत व वर्तनात सातत्य नसल्याने त्यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असे जाणकारांचे मत आहे. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती बाहेर येण्यास नऊ वर्षे लागली. तोपर्यंत नाशिक महापालिकेत त्यांना सत्ता मिळाली, पण तेथेही त्यांनी प्रभावी काम करून दाखवता आले नाही. शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन झाल्याने लोकांपर्यंत ती पोहोचली नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्याबाबतही टोकाची भाषा राज यांनी केली होती. नाशिकमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यावर राज यांनी थेट त्याच भुजबळ यांच्याशी हातमिळवणी केली. राज अशा कोलांटउड्यांमुळे त्यांचा पक्ष गटांगळ्या खात राहिला. (प्रतिनिधी)