शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राज यांना भोवले दुटप्पी राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 03:39 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आणि विधानसभा निवडणुकीत मोदींवर टीकास्त्र सोडायचे, राज ठाकरे यांच्या या दुटप्पी राजकारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुरती धूळधाण झाली आहे. १३ आमदारांवरुन त्यांची संख्या एका आमदारावर आली.२००९च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची मते मिळवून १३ आमदार निवडून आणणाऱ्या राज यांची राजकीय वाटचाल दमदार असेल, असे भाकित वर्तविले होते, पण राज यांनी उलटसुलट भूमिका घेत त्यांनी स्वत:बरोबर पक्षालाही चक्रव्युहात टाकले. मोदींबाबतच्या उलटसुलट विधानांनी युवावर्ग त्यांच्यापासून दूर गेला. उच्च मध्यमवर्गीय मराठी माणूसही सध्या मोदींच्या प्रभावाखाली आहे. राज यांच्या ब्ल्यू प्रिंटचे या वर्गाला आकर्षण वाटेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु केंद्रात व राज्यात मोदी सरकार द्या हे पंतप्रधानांचे आवाहन अधिक प्रभावी ठरल्याने या वर्गाने मनसेच्या ब्ल्यू प्रिंटकडे पाठ फिरवली. मुंबईतील किमान १० विधानसभा मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय मतदारांनी भाजपाला एकगठ्ठा मतदान केले आहे. मनसेने पक्ष स्थापनेच्या वेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मारहाण केली होती. त्या वर्गाला मोदींचा पर्याय समोर दिसल्यावर त्यांनी मनसेच्या दबावाला झुगारून मतदान केले आहे. घाटकोपर (प.) व मुलुंड या दोन मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का हा अमराठी लोकांपेक्षा अधिक आहे. त्या मतदारसंघांतही भाजपाने विजय मिळवला याचा अर्थ मनसेने मराठी माणसांची घोर निराशा झाली आहे.राज यांच्या भूमिकांत व वर्तनात सातत्य नसल्याने त्यांची विश्वासार्हता लयाला गेली आहे, असे जाणकारांचे मत आहे. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात ती बाहेर येण्यास नऊ वर्षे लागली. तोपर्यंत नाशिक महापालिकेत त्यांना सत्ता मिळाली, पण तेथेही त्यांनी प्रभावी काम करून दाखवता आले नाही. शिवसेना-भाजपा युती तुटण्याच्या मुहूर्तावर ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन झाल्याने लोकांपर्यंत ती पोहोचली नाही. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्याबाबतही टोकाची भाषा राज यांनी केली होती. नाशिकमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यावर राज यांनी थेट त्याच भुजबळ यांच्याशी हातमिळवणी केली. राज अशा कोलांटउड्यांमुळे त्यांचा पक्ष गटांगळ्या खात राहिला. (प्रतिनिधी)