शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाचा शेतीवर परिणाम नको

By admin | Updated: January 18, 2016 03:44 IST

साखर उद्योग सध्या अडचणीतून चालला आहे, साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादकांना दर मिळणार नाही.

शिरोळ (जि. कोल्हापूर) : साखर उद्योग सध्या अडचणीतून चालला आहे, साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादकांना दर मिळणार नाही. शेतीवर परिणाम होणारे राजकारण करू नका, उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिशा देणारे राजकारण करूया, असे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते. पवार म्हणाले, आज साखर कारखानदारीसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. ब्राझील, इस्रायल, इंडोनेशिया यासारख्या देशातील साखर उत्पादन व ऊस दर याचा विचार करता आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान राबविण्याची गरज आहे. देशात गरजेपेक्षा साखरेचे उत्पादन वाढले आहे. साखर निर्यातीशिवाय बाजारभाव सुधारणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार टिकला पाहिजे ही शासनाची भूमिका असून, शासनाने साखर उद्योगाला अडचणीच्या काळात मदतच केली आहे. कारखाने टिकले तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. ज्यांनी संस्था मोडल्या त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या भूमिकेवर शासन ठाम आहे.