शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डाळीला राजकीय फोडणी

By admin | Updated: November 7, 2015 03:02 IST

तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात

बारामती : तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला होता; मात्र आता सणाच्या काळात डाळ महागली आहे, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारली. त्यावर फडणवीस यांनीही लगेच पलटवार केला. आधीच्या सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभावाने तुरीची खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन कमी केले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले.बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. गहू, कापूस, साखर उत्पादनात देश सक्षम आहे. मात्र, डाळी व खाद्यतेलात आपण मागे आहोत. हे उत्पादन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पवार यांनी भाषणात नोंदविली. त्यावर डाळी व तेलबियांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना अमलात आणण्याचे ठरविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी राज्यातील १ हजार ५९ मंडल कृषी कार्यालयांच्या अंतर्गत हवामान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पवारांचे सारथ्य!शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांच्या कार्यक्रमांना वर्षभरात भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरादेखील राजकीय पटलावर चर्चेचा होता. मात्र, कार्यक्रमात राजकीय भाष्य टाळले गेले. ‘कृषिक’ प्रदर्शनाची पाहणी फडणवीस यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीत बसून केली. या गाडीत समोरच्या बाजूला पवार तर पाठीमागे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे होते. त्यामुळे सरकारचे सारथ्य पवार तर करत नाहीत ना, अशी मिश्कील टिप्पणी उपस्थितांमधून झाली.पाण्याला विरोध करणे चुकीचे - पवार पाऊस कमी पडल्याने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास काही ठिकाणी विरोध केला जात आहे, हे चुकीचे आहे. परिस्थिती गंभीर असताना पिण्याच्या पाण्याला विरोध न करता माणुसकीचे दर्शन घडवले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी नगर व नाशिकच्या नेत्यांना दिला.