शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

डाळीला राजकीय फोडणी

By admin | Updated: November 7, 2015 03:02 IST

तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात

बारामती : तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला होता; मात्र आता सणाच्या काळात डाळ महागली आहे, अशी कोपरखळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारली. त्यावर फडणवीस यांनीही लगेच पलटवार केला. आधीच्या सरकारने ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभावाने तुरीची खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकांचे उत्पादन कमी केले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सांगितले.बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. गहू, कापूस, साखर उत्पादनात देश सक्षम आहे. मात्र, डाळी व खाद्यतेलात आपण मागे आहोत. हे उत्पादन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पवार यांनी भाषणात नोंदविली. त्यावर डाळी व तेलबियांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजना अमलात आणण्याचे ठरविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी राज्यातील १ हजार ५९ मंडल कृषी कार्यालयांच्या अंतर्गत हवामान केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पवारांचे सारथ्य!शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांच्या कार्यक्रमांना वर्षभरात भाजपाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरादेखील राजकीय पटलावर चर्चेचा होता. मात्र, कार्यक्रमात राजकीय भाष्य टाळले गेले. ‘कृषिक’ प्रदर्शनाची पाहणी फडणवीस यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीत बसून केली. या गाडीत समोरच्या बाजूला पवार तर पाठीमागे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे होते. त्यामुळे सरकारचे सारथ्य पवार तर करत नाहीत ना, अशी मिश्कील टिप्पणी उपस्थितांमधून झाली.पाण्याला विरोध करणे चुकीचे - पवार पाऊस कमी पडल्याने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास काही ठिकाणी विरोध केला जात आहे, हे चुकीचे आहे. परिस्थिती गंभीर असताना पिण्याच्या पाण्याला विरोध न करता माणुसकीचे दर्शन घडवले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी नगर व नाशिकच्या नेत्यांना दिला.