शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांनीही समित्या स्थापन कराव्या

By admin | Updated: July 9, 2014 01:00 IST

पक्षांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या मुख्यालयी समिती स्थापन करावी, तसेच या मुद्याचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी विनंती राज्य महिला

महिला सुरक्षेचा मुद्दा : महिला आयोगाची सूचनानागपूर : पक्षांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या मुख्यालयी समिती स्थापन करावी, तसेच या मुद्याचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी विनंती राज्य महिला आयोगाच्या प्रमुख सुसीबेन शहा यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठविले असून यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.राज्य महिला आयोगाच्या सुनावणीसाठी शहा मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. सुनावणीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्यात आल्याने महिलांचा राजकारणातील सहभाग वाढला आहे. त्यातून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी पक्षातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यालयी एक समिती स्थापन करावी तसेच या मुद्याचा जाहीरनाम्यातही समावेश करावा, असे शहा म्हणाल्या. येत्या २६ जुलैला मुंबईत आयोजित महिला विधी शिबिरात यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आयोगाच्या कामकाजासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, आयोगाकडे तक्रारी येत आहेत. पण आयोगानेच महिलांपर्यत पोहोचावे म्हणून प्रत्येक विभागात सुनावणी घेतली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सोमवारी अमरावतीत व मंगळवारी नागपुरात सुनावणी घेण्यात आली. आचारसंहितेमुळे अत्यल्प वेळ मिळाला असला तरी आतापर्यंत संपूर्ण राज्यातून सरासरी १५०० तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी ४० टक्के प्रकरणांवर निवाडा करण्यात आला. अमरावतीत ६० प्रकरणांवर सुनावणी झाली आहे. आयोगाची प्रक्रिया निर्विघ्नपणे सुरू राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संकेतस्थळ नवीन निर्माण करण्यात येत असून त्यावर पीडित महिलांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यात आयोगाचे पत्रक लावण्यात येईल व त्यावर आयोगाच्या अध्यक्षांसह इतर प्रमुख सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले जातील. यामुळे महिलांना आयोगाशी संपर्क साधणे सोयीचे होईल.शासनाकडून असहकार्यमहिला आयोगाला शासकीय पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याची बाब सूसीबेन शहा याच्या वक्तव्यातून स्पष्ट झाली. विभाग पातळीवर मुख्यालय असावे,असे प्रयत्न महिला आयोगाचे होते. मात्र त्यात शासकीय पातळीवरून अडचणी येत आहेत. तसेच खासगी कंपन्यांमध्ये अशा प्रकारची समिती स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशाच प्रकारची समिती असंघिटत क्षेत्रातील महिला कामगारांसाठी स्थापन करावी, असा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. सध्या तो प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. ‘त्या’आदेशाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल कराहुंडाबळीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाने फेरविचार याचिका दाखल करावी, असे मत शहा यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगालाही भावना कळविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ, विजया बांगडे, प्रशासकीय अधिकारी अर्जुन डांगट आणि उपजिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)