शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

राजकीय पक्षांनीही समित्या स्थापन कराव्या

By admin | Updated: July 9, 2014 01:00 IST

पक्षांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या मुख्यालयी समिती स्थापन करावी, तसेच या मुद्याचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी विनंती राज्य महिला

महिला सुरक्षेचा मुद्दा : महिला आयोगाची सूचनानागपूर : पक्षांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या मुख्यालयी समिती स्थापन करावी, तसेच या मुद्याचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करावा, अशी विनंती राज्य महिला आयोगाच्या प्रमुख सुसीबेन शहा यांनी केली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठविले असून यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.राज्य महिला आयोगाच्या सुनावणीसाठी शहा मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. सुनावणीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. निवडणुकांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करण्यात आल्याने महिलांचा राजकारणातील सहभाग वाढला आहे. त्यातून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी पक्षातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यालयी एक समिती स्थापन करावी तसेच या मुद्याचा जाहीरनाम्यातही समावेश करावा, असे शहा म्हणाल्या. येत्या २६ जुलैला मुंबईत आयोजित महिला विधी शिबिरात यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आयोगाच्या कामकाजासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, आयोगाकडे तक्रारी येत आहेत. पण आयोगानेच महिलांपर्यत पोहोचावे म्हणून प्रत्येक विभागात सुनावणी घेतली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून सोमवारी अमरावतीत व मंगळवारी नागपुरात सुनावणी घेण्यात आली. आचारसंहितेमुळे अत्यल्प वेळ मिळाला असला तरी आतापर्यंत संपूर्ण राज्यातून सरासरी १५०० तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी ४० टक्के प्रकरणांवर निवाडा करण्यात आला. अमरावतीत ६० प्रकरणांवर सुनावणी झाली आहे. आयोगाची प्रक्रिया निर्विघ्नपणे सुरू राहावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संकेतस्थळ नवीन निर्माण करण्यात येत असून त्यावर पीडित महिलांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यात आयोगाचे पत्रक लावण्यात येईल व त्यावर आयोगाच्या अध्यक्षांसह इतर प्रमुख सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक दिले जातील. यामुळे महिलांना आयोगाशी संपर्क साधणे सोयीचे होईल.शासनाकडून असहकार्यमहिला आयोगाला शासकीय पातळीवरून सहकार्य मिळत नसल्याची बाब सूसीबेन शहा याच्या वक्तव्यातून स्पष्ट झाली. विभाग पातळीवर मुख्यालय असावे,असे प्रयत्न महिला आयोगाचे होते. मात्र त्यात शासकीय पातळीवरून अडचणी येत आहेत. तसेच खासगी कंपन्यांमध्ये अशा प्रकारची समिती स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशाच प्रकारची समिती असंघिटत क्षेत्रातील महिला कामगारांसाठी स्थापन करावी, असा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. सध्या तो प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. ‘त्या’आदेशाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल कराहुंडाबळीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाने फेरविचार याचिका दाखल करावी, असे मत शहा यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगालाही भावना कळविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेला महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ, विजया बांगडे, प्रशासकीय अधिकारी अर्जुन डांगट आणि उपजिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)