शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

राजकीय यानात नेत्यांची चंगळ-मंगळ !

By admin | Updated: September 25, 2014 09:26 IST

मॉम’च्या यशानंतर भारतानं म्हणे लोकांना घेऊन जाणारं ‘यान’ मंगळावर पाठविण्याचा निर्णय घेतलेला. या यानात बसण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झालेली. त्याचाच हा रसभरीत वृत्तांत.)

होऊ दे चर्चा...

(‘मॉम’च्या यशानंतर भारतानं म्हणे लोकांना घेऊन जाणारं ‘यान’ मंगळावर पाठविण्याचा निर्णय घेतलेला. या यानात बसण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झालेली. त्याचाच हा रसभरीत वृत्तांत.)नरेंद्रभाई : (हात जोडून सर्वांचं स्वागत करत) आईयेऽऽ आईये. हमारे ‘यान कक्ष’ में आपका स्वागत.पृथ्वीराज : (लगेच मोबाईल लावत) हॅल्लो मॅऽऽडम... पिछले साल आपने भेजा हुआ रॉकेटभी अब उन्होंने ‘हायजॅक’ किया है. जसं काही त्यांच्यामुळंच ही मोहीम यशस्वी झाली, असं वातावरण तयार केलं गेलंय. काय म्हणता मॅडम? अगोदर जागेचा प्रश्न सोडवू म्हणता... ओके मॅडम. जीऽऽ मॅडम.शेट्टी : (सर्वात प्रथम यानात शिरत) बजाव शिट्टी. माझाच पहिला नंबरऽऽरामदास : (जानकरांना डिवचत) बघा. बघा. त्यांना इथं येण्यासाठी म्हणे स्पेशल विमान दिलं गेलंय. अन् आपल्या दोघांना काय? बाबूजी का टुल्लू...!जानकर : नुसत्या गप्पा मारण्यातच आपण आपला वेळ घालवतोय. अगोदर आत शिरा अन् जागा पकडा. थोरल्या काकांनी गुपचूप विनंती केली तर नरेंद्रभाई आपल्याला बाहेरही काढतील कदाचित.देवेंद्रपंत : थांबा. अगोदर आमच्या अन् उद्धोंच्या जागा फायनल होऊ द्या. त्यातून एखादी-दुसरी मागची सीट शिल्लक राहिली, तर तुम्हाला देऊ.शेट्टी : (संतापून) म्हणजे, ‘गार्ड’च्या सीटवर आम्ही तिघांनी बसायचं की काय? चला रे बाहेरऽऽ..घात झाला!उद्धो : आता मी ‘पायलट’ची खुर्ची सोडायला तयार झालोय... तिथं तुमचा प्रॉब्लेम किस झाड की पत्ती?माणिकराव : आम्ही मात्र, इतके कंजूष नाही बुवा. एका झटक्यात दहा-बारा जागा देऊन टाकल्या काकांना.प्रफुल्ल : (नव्या वादाला तोंड फोडत) पण आम्हाला ‘पायलट’ची खुर्चीही निम्मी-निम्मी हवी, तरच आम्ही यानात शिरणार!नारायण : (अस्सल ‘कोकणीबाज डोकं’ वापरत) मग चंद्रापर्यंत आम्ही त्या खुर्चीवर बसतो, नंतर तिथून पुढं तुम्ही घ्या. तेवढ्यासाठी तुमचं घोडं अडवू नका.अजितदादा : (तोंडाला पट्टी बांधल्यामुळं केवळ हातवारे करत) ऊंऽऽऊं...ऊंऽऽथोरले काका : (धास्तावून) आता हा कोणता नवा प्रयोग म्हणायचा? आपलं ‘यान’ नीट पोहोचेल नां मंगळावर?आबा : पत्रकारांना विश्वासात घेऊन मन मोकळं केलं तरीही म्हणे मीडियावाल्यांनी त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ केली; म्हणून नाराज दादांनी सध्या मौनव्रत स्वीकारलंय. यापुढं, जो काही संवाद साधायचा तो फेसबुकवरच म्हणे !राज : (संशयानं) पण, ते ऊंऽऽऊंऽ का करताहेत? नाशकात आम्हाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही नां?छगन : छे. छे. दादांचं म्हणणं असंय की, ‘मंगळावर पाणी नसेल, तर सिंचन योजनाही नसणार. मग तिथं येऊन मी काय करू?’- सचिन जवळकोटे