शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राजकीय वैमनस्यातून हत्या, चौघांची जन्मठेप कायम

By admin | Updated: August 5, 2014 01:00 IST

वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील थरारक घटनानागपूर : वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. विजय ऊर्फ गुड्डू बाबाराव महाकाळकर (३४), विनोद जंगलू भाकरे (३४), देवानंद भरत महाकाळकर (३५) व शंकर गोविंद लांडगे (३५) अशी आरोपींची नावे आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने या चारही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड, कलम १२०-ब अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, तर कलम ३४१ अंतर्गत १ महिना कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच, कलम १२०-ब अंतर्गतची शिक्षा भोगल्यानंतर अन्य कलमांतर्गतची शिक्षा एकाच वेळी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सेवाग्राम पोलिसांनी एकूण १९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने वरील चार आरोपी वगळता अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. अन्य आरोपींमध्ये राधेश्याम ओंकार महाकाळकर (२८), जंगलू गणपत भाकरे (५९), राजू बाबाराव महाकाळकर (२८), दिलीप पंढरी महाकाळकर (३०), संदीप यशवंत महाकाळकर (३२), सुरेश दौलत थोटे (५७), जानराव शंकर धांडे (४८), विलास नरसिंग महाकाळकर (४३), हृदयनाथ भाऊराव सोनटक्के (२६), नरसिंग विठोबा महाकाळकर (६७), विलास बाबुलाल पाहुणे (४३), यशवंत श्यामराव महाकाळकर (५२), भास्कर जंगलू भाकरे (५२), ज्ञानेश्वर उर्फ नाला नारायण काचोडे (४५) व रणजित वसंत शिंदे (४७) यांचा समावेश आहे. शेवटचे दोघे नालवाडी, तर इतर सर्व आरोपी महाकाळ (वर्धा) येथील रहिवासी आहेत. दोषी आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध, तर राज्य शासन व मृताची पत्नी अर्चना यांनी १५ आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता तिन्ही अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.मृताचे नाव मकरंद टोंपे होते. खटल्यातील माहितीनुसार, महाकाळ गावात दोन राजकीय गट होते. टोंपे हे एका गटाचे नेतृत्व करीत होते. हा गट काही वर्षे सत्तेवरही होता. आरोपी दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करीत होते. शत्रुत्वामुळे दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर ३१ आॅगस्ट २००७ रोजी सकाळी सातोडा गावातील शेतात टोंपे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याच दिवसी दोन प्रत्यक्ष साक्षीदारांचे बयान नोंदवून आरोपींना अटक केली होती. दोषी आरोपींविरुद्ध वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, निर्दोष आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा, शासनातर्फे एपीपी डी. बी. पटेल, तर अर्चना टोंगेंतर्फे व्ही. आर. मुंदडा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)