शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही

By admin | Updated: September 21, 2015 00:31 IST

‘मॉर्निंग वॉक’मधील सूर : पुरोगामी संघटनांकडून पोलिसांच्या तपासावर समाधान

कोल्हापूर : पुरोगामी संघटनांतर्फे पानसरेंचे सागरमाळ येथील निवासस्थान ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर समाधान व्यक्त करण्यात आले. संशयिताला पकडण्यात यश मिळाले असले तरी या तपासात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. पोलिसांना पुढील तपासासाठी सगळ्यांनीच सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गोविंद पानसरे सकाळी सागरमाळ ते शिवाजी विद्यापीठ परीक्षा भवन या मार्गावर फिरायला जात होते़ त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेबु्रवारीला पानसरे यांचे निधन झाले होते़ या खुनानंतर पुरोगामी चळवळीला निर्भयतेचा संदेश देण्यासाठी डाव्या आणि अन्य पुरोगामी कार्यकर्त्यांनी पानसरेंच्या या मार्गावर गेले सात महिने दर महिन्याच्या २० तारखेला ‘मॉर्निंग वॉक’ सुरू केले.यावेळी नर्मदा आंदोलनातील कार्यकर्त्या सुनीती सुलभा रघुनाथ म्हणाल्या, प्रागतिक विचारांचे लोक धर्माचा पगडा असलेल्या सर्वसामान्य लोकांशी फटकून वागतात़ या सर्वसामान्य लोेकांना धर्मांधाकडून होणारे शोषण माहीत नसते़ त्यामुळे ते सहजपणे ‘सनातन’सारख्या धर्मांध शक्तीसोबत एकरूप होतात़ अशा हिंदू नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना पुरोगामीत्व समजून सांगणे व त्यांची शोषणातून मुक्तता करणे ही पुरोगाम्यांची जबाबदारी आहे़ सकाळी सात वाजता या ‘मॉर्निंग वॉक’ला पानसरे यांच्या घरापासून प्रारंभ झाला़ ‘आम्ही सारे पानसरे’ अशा टोप्या घातलेले कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले होते़ मारेकरी सापडून त्यांना शिक्षा होईपर्यंत हे वॉक सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला़ वॉकमध्ये मेघा पानसरे, सुरेश शिपूरकर, तनुजा शिपूरकर, दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, एस़ बी़ पाटील, उदय नारकर, प्रा़ रणधीर शिंदे, अलका देवलापूरकर, सुचेता पडळकर, विनय रघुनाथ, नरहर कुलकर्णी, जीवन बोडके, राजेंद्र पारिजात, उमेश पानसरे, कबीर पानसरे, ज्योती भालकर, सीमा पाटील, रसिया पडळकर होते़ (प्रतिनिधी) ‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन रविवारी झालेल्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये गोविंद पानसरेलिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘हू वॉज शिवाजी’चे पुनर्प्रकाशन प्राचार्य टी़ एस़ पाटील यांच्या हस्ते झाले़ या पुस्तकाचा अनुवाद उदय नारकर यांनी केला असून दिल्ली येथील लेफटवर्ड या प्रकाशनाने हे पुस्तक पानसरे यांच्या हत्येनंतर प्रकाशित केले आहे. प्राचार्य टी़ एस़ पाटील म्हणाले, पानसरेंनी ब्रिटिश, पर्शियन, पोर्तुगीज काळात शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलेल्या संदर्भपूर्ण पुस्तकांची सुमारे दहा हजार पाने वाचून ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक पानसरेंनी लिहिलेले आहे. समीरची आई सांगलीत परतलीसांगली : कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडची आई शांताबाई गायकवाड या रविवारी सांगलीत घरी परतल्या. गेल्या चार दिवसांपासून त्या कोल्हापुरात होत्या.पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीरला गेल्या आठवड्यात सांगलीत अटक केली होती. तेव्हापासून त्याची आई कोल्हापुरात होती. रविवारी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी आम्हाला कोणाशी बोलायचे नाही, असे सांगून दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. सुरुवातीला एक पोलीस तैनात होता; पण रविवारपासून दोन पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक सांगलीत येणार असल्याची चर्चा सुरू राहिल्याने सांगली पोलीस सतर्क झाले होते.