शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पाणी पळविण्याचा आरोप राजकीय हेतूने

By admin | Updated: January 17, 2015 05:25 IST

दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-तापी प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातला पाणी पळविले जात असल्याच्या आरोपावर रा

नाशिक : दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-तापी प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातला पाणी पळविले जात असल्याच्या आरोपावर राज्य सरकारची बाजू मांडताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना बरीच सारवासारव करावी लागली. आधीच्या सरकारनेच नार-पार-तापी प्रकल्पाबाबत गुजरातबरोबर सामंजस्य करार केला असून, त्याचीच अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.गुजरात सरकार महाराष्ट्राचे पाणी पळवित असल्याचा आरोप राजकीय हेतूने केला जात असून, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी राज्यालाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला. नार-पार-तापी प्रकल्पात १,८०० लक्ष घनमीटर इतके पाणी मिळणार असून, त्यातील ८०० लक्ष घनमीटर पाणी राज्याला व एक हजार लक्ष घनमीटर पाणी गुजरातला देण्याचा करार २०१० मध्ये तत्कालीन कॉँग्रेस सरकारने केलेला आहे. त्यानुसार राज्याला हक्काचे पाणी मिळणारच असून, फक्त ते हजार ते बाराशे फूट उंचीपर्यंत कसे उचलायचे एवढाच तांत्रिक प्रश्न आहे. राज्य सरकार जर हे पाणी उचलू शकले नाही, तर तापी खोऱ्यातून गुजरातच्या वाट्याला दिले जाणारे तितकेच पाणी महाराष्ट्र सरकार गुजरातकडून घेईल, असेही ते म्हणाले. चार महिन्यांनंतर सविस्तर अहवाल तयार झाल्यानंतरच प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात येईल. इतकी वर्षे समुद्रात पाणी वाहून जात होते, तेव्हा कोणी लक्ष दिले नाही, आता मात्र पाण्यावरून राजकारण करून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे पाणी गुजरातला देऊ नये, असा ठराव बागलाणच्या राष्ट्रवादीच्या आमदार दीपाली चव्हाण यांनी मांडला. त्यास माकपाचे आमदार जिवा पांडू गावित यांनी अनुमोदन दिले मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यावर सोयिस्कर मौन पाळले. (प्रतिनिधी)