शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पाणी पळविण्याचा आरोप राजकीय हेतूने

By admin | Updated: January 17, 2015 05:25 IST

दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-तापी प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातला पाणी पळविले जात असल्याच्या आरोपावर रा

नाशिक : दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-तापी प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातला पाणी पळविले जात असल्याच्या आरोपावर राज्य सरकारची बाजू मांडताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना बरीच सारवासारव करावी लागली. आधीच्या सरकारनेच नार-पार-तापी प्रकल्पाबाबत गुजरातबरोबर सामंजस्य करार केला असून, त्याचीच अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.गुजरात सरकार महाराष्ट्राचे पाणी पळवित असल्याचा आरोप राजकीय हेतूने केला जात असून, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी राज्यालाच मिळेल, असा दावाही त्यांनी केला. नार-पार-तापी प्रकल्पात १,८०० लक्ष घनमीटर इतके पाणी मिळणार असून, त्यातील ८०० लक्ष घनमीटर पाणी राज्याला व एक हजार लक्ष घनमीटर पाणी गुजरातला देण्याचा करार २०१० मध्ये तत्कालीन कॉँग्रेस सरकारने केलेला आहे. त्यानुसार राज्याला हक्काचे पाणी मिळणारच असून, फक्त ते हजार ते बाराशे फूट उंचीपर्यंत कसे उचलायचे एवढाच तांत्रिक प्रश्न आहे. राज्य सरकार जर हे पाणी उचलू शकले नाही, तर तापी खोऱ्यातून गुजरातच्या वाट्याला दिले जाणारे तितकेच पाणी महाराष्ट्र सरकार गुजरातकडून घेईल, असेही ते म्हणाले. चार महिन्यांनंतर सविस्तर अहवाल तयार झाल्यानंतरच प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात येईल. इतकी वर्षे समुद्रात पाणी वाहून जात होते, तेव्हा कोणी लक्ष दिले नाही, आता मात्र पाण्यावरून राजकारण करून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे पाणी गुजरातला देऊ नये, असा ठराव बागलाणच्या राष्ट्रवादीच्या आमदार दीपाली चव्हाण यांनी मांडला. त्यास माकपाचे आमदार जिवा पांडू गावित यांनी अनुमोदन दिले मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यावर सोयिस्कर मौन पाळले. (प्रतिनिधी)