शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील प्रश्नांना राजकीय रंग

By admin | Updated: July 9, 2017 00:00 IST

मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लढविलेली आॅनलाइन तपासणीची शक्कल अयशस्वी झाल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागावेत, म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी लढविलेली आॅनलाइन तपासणीची शक्कल अयशस्वी झाल्याने, विद्यापीठाचे निकाल, प्रवेश अशा सर्वच प्रक्रियेला विलंबाचा टीळा लागला आहे. त्यातच एफडी तोडल्याची माहिती पुढे आल्याने, आता सर्वच स्तरातून कुलगुरूंवर टीका होत आहे. तर विद्यापीठातील प्रश्नांना राजकीय रंग येऊ लागले आहेत. शनिवारी, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीही विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळावर टीका केली, तर अनेक संघटनांकडून कुलगुरूंच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. निकाल लवकर लागावेत, म्हणून आॅनलाइन पद्धतीचा वापर यंदापासून करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला, मात्र तो फसला. त्यामुळे जून महिना संपूनही निकाल जाहीर झाले नाहीत. विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले. त्यामुळे या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर, १११ एफडीच्या ठेवी मुदतपूर्व काढल्याची माहिती समोर आली, पण कुलगुरूंनी याला नकार दिला. शनिवारी, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठातील गोंधळावर टीका करीत, एफडी प्रकरणी कुलगुरूंची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. विद्यापीठात आॅनलाइन प्रवेश होत नाहीत, तर मग आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा अट्टाहास का? असा प्रश्नही या वेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबई विद्यापीठात होत असलेल्या कारभाराची गंभीर दखल घेतली पाहिजे. एफडी मुदतपूर्व तोडल्या गेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी करणारे पत्र स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुदतपूर्व ठेवी काढल्याने, विद्यार्थ्यांचा विद्यापीठावरचा विश्वास कमी होईल. याविषयी कुलगुरूंची चौकशी करावी, अशी मागणी मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीदेखील केली आहे. प्रहार विद्यार्थी संघटनेनेही कुलगुरूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.