शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शिवजयंतीनिमित्तानं भगवा झेंडा लावण्यावरुन झालेल्या वादास राजकीय रंग

By admin | Updated: February 22, 2016 16:58 IST

रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. २२ -  रेणापूर  तालुक्यातील पानगाव येथील वादग्रस्त जागेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध केल्याने पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे. शिवजयंतीनिमित्तानं १८ तारखेला भगवा झेंडा लावण्यावरुन काही तरुण आणि पोलिसांत झालेल्या मारहाणी प्रकरणाला आज वेगळे वळण मिळाले आहे. 
 
एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांच्या प्रक्षोभक ट्विटनंतर आज आमदार इम्तियाज जलील यांनी लातुरमध्ये मोर्चा काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले आहे. 
 
 प्रकरण काय आहे -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री पानगाव येथील वादग्रस्त जागेवर जयंती उत्सव समितीचे काही कार्यकर्ते ध्वज लावण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकार्‍याने विरोध केला. 
दरम्यान, शुक्रवारी सकाळी या अधिकार्‍यास जमावाकडून जबर मारहाण झाली. या प्रकरणी रेणापूर ठाण्यात १२५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन १२ जणांना अटक करण्यात आली होती. रविवारी आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पानगावात शांतता रहावी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेणापूर पोलिसांचे पथक अन्य आरोपींचा शोध घेत आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.