शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पोलिसांची किटपेटी निवृत्तीनंतरही त्यांच्या सोबत राहणार!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:07 IST

पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- जमीर काझी मुंबई, दि. 17 - पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोलीस मुख्यालयात मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील दोन लाखावर पोलीस अंमलदारांना आठवण म्हणून भेट स्वरुपात आपल्याजवळ बाळगता येणार आहे.खात्यात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाला हजर झाल्यानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलना खात्याकडून मिळालेले गणवेष किट ठेवण्यासाठी लोखंडी मजबूत पेटी दिली जाते. त्याला गणवेष किट असे संबोधण्यात येते. अंमलदारांने गणवेष, टोपी, बॅँच, लाईन यार्ड, पट्टा तसेच दैनदिन वापरासाठी लागणारे साहित्य त्याला एकत्र ठेवता यावी, जेणेकरुन नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यास त्याला आवश्यक साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. ब्रिटीश काळापासून ही पद्धत अनुसरली जात आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी, तसेच पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर आपली किट पेटी खराब होवू नये तसेच सहजपणे ओळखली जावी, यासाठी त्याला रंगवून आपले नाव व बक्कल नंबर लिहून ठेवतात. खात्यात कार्यरत असेपर्यत सुमारे ३५,३८ वर्षे ही पेटी सोबतच ठेवत असतात. अंमलदार असल्याने त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी स्वतंत्र खोली मिळू शकत नाही. त्यामुळे या गणवेष कीटमध्ये ते आपले साहित्य ठेवत असतात.अधिक वाचा- शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मानपोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागणमात्र पोलीस रिटायर झाल्यानंतर त्यांना ती कार्यरत असलेल्या पोलीस मुख्यालयात जीर्ण व जुनी झालेली लोखंडी पेटी जमा करणे बंधनकारक असते. त्याशिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. पोलीस दलाची आठवण म्हणून ती आपल्या सोबत रहावी, अशी अंमलदारांची इच्छा असते. त्यामुळे ती अंमलदारांना देण्यात यावी, अशी मागणी नांदेडमधील सहाय्यक फौजदार ढगे यांनी केली होती. मध्यवती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस नियमावलीतील भाग २ नियम १०(५) मधील तरतुदीनुसार घटकप्रमुखांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, कीटपेटी इतरांना वापरण्या योग्य नसल्यास ती संबंधित अंमलदारांकडे राहू देण्यात यावी, असे निर्देश दिले.पोलिसांना किटपेटी सदैव वापरावी लागत असल्याने त्याच्याशी एक भावनिकता निर्माण झालेली असते.इतक्या वर्षानंतर ती दुसºयाला वापरण्याजोगे नसल्याने ती संबंधित कर्मचाºयाला देण्याबाबत घटकप्रमुखांना अधिकार देण्यात आला आहे.-सतीश माथूर (पोलीस महासंचालक)