शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भाडोत्री जागेतच पोलीस ठाणे

By admin | Updated: June 29, 2016 01:20 IST

जवळपास २६ वर्षांनंतरदेखील वालचंदनगर पोलीस ठाण्याला त्यांच्या हक्काची इमारत मिळालेली नाही.

वालचंदनगर : जवळपास २६ वर्षांनंतरदेखील वालचंदनगर पोलीस ठाण्याला त्यांच्या हक्काची इमारत मिळालेली नाही. आजही चौकी वालचंदनगरला व पोलीस ठाणे सात किलोमीटरवर जंक्शनला भाड्याच्या खोलीत कामकाज सुरू आहे. इमारत मोडकळीस आल्याने जीव मुठीत धरून कर्मचाऱ्यांना काम करण्याची वेळ आलेली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याची स्थापना ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेली आहे. त्या वेळी पोलीस अधीक्षक भगवंतराव मोरे होते. या भागातील खासदार म्हणून शंकरराव पाटील व आमदार गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीत या ठाण्याचे उद्घाटन करण्यात आलेले होते. पोलीस ठाण्याला मोडकळीस आलेल्या भाड्याच्या धोकादायक खोलीत दिवस काढण्याची वेळ आली आहे. गेल्या २६ वर्षांपासून हे पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या नियोजित बांधकामासाठी हक्काची इमारत होण्यासाठी शेती महामंडळाच्या पाच एकरांच्या जमिनीसाठी ऐंशी लाखांचा करार होऊनही पोलीस ठाणे इमारतीपासून वंचितच आहे. येथील ५० कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. पोलीस ठाणे जरी जंक्शनला असले तरी कर्मचारीवर्गाला कसलीही राहायला सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ३५ किलोमीटरवरील बारामती व इंदापूर शहरात राहण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. (वार्ताहर)>पाच एकर जागा मंजूर : मोजणीअभावी क्षेत्राचा पत्ता नाहीया वालचंदनगर पोलीस ठाण्याचे नूतनीकरण व नवीन इमारत उभी राहण्यासाठी शेती महामंडळाच्या बारा एकर जमिनीचा पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता. २००२ मध्ये पुन्हा प्रस्ताव बदलून पाच एकर करण्यात आला. त्या पाच एकराला शेती महामंडळाने मंजुरी दिल्याने शासनाने शेती महामंडळाला ८० लाख रुपये दिले होते. मात्र आजही शेती महामंडळाकडून पोलीस ठाण्याला जमीन मोजून न दिल्याने नेमके पोलीस ठाणे कोठे उभारणार, याचा ताळमेळ लागला नाही. जमीन पोलीस ठाण्याला हस्तांतर करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्याची नेमकी जागा कुठे आहे, याची माहिती नाही. आज या वालचंदनगर कंपनीच्या भाड्याच्या खोलीत ३० रुपये प्रतिमहिना दिवस काढण्याची वेळ येथील पोलीस ठाण्यावर आलेली आहे. कर्मचाऱ्यांना हक्काची इमारत, सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना बारामती व इंदापूर या तालुक्याच्या ठिकाणी राहायला जाण्याची वेळ येते.