शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

पोलिस निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: May 12, 2014 22:35 IST

बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब: येथील पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे निवासस्थानांमध्ये राहणार्‍या पोलिसांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे निवासस्थांनांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलंब येथे ब्रिटीश काळापासून पोलिस स्टेशन आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत ४0 खेड्यांचा समावेश आहे. यासर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून येथे ३५ पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कार्यरत आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी २२ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, उभारण्यात आल्यानंतर या निवासस्थानांची देखभालच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता केवळ ५-६ निवासस्थानेच राहण्याजोगे आहेत. उर्वरीत सर्वच निवास्थानांना नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये बहुतांश निवासस्थानातील शौचालयाचे दरवाजे तुटले आहे. तर काही निवासस्थानाला दरवाजेच नाही. काही वर्षाअगोदर पोलिस निवासस्थानाची फक्त थातुरमातूर डागडुजीचे काम करण्यात आले होते. एक ना अनेक समस्या असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना जिव मुठीत धरुन आपले कर्तव्य बचावत राहावे लागते. पोलिसांना रात्रीच्या वेळी तडे गेलेल्या भिंतीच्या आत साप, विंचू येण्याच्या दहशतीत रात्र काढावी लागते. भिंती इतक्या जीर्ण झाल्या आहेत की उंदीर सुध्दा भिंतीवरुन गेल्यास खाली रेती व माती पडत आहे. त्याचबरोबर निवासस्थानांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पोलिसांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. डोळ्यात तेल घालून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणार्‍या पोलिसांच्या घराचे रक्षण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला असूून जुनाट जिर्ण झालेली निवासस्थाने पाडून सर्व पोलिस कर्मचार्‍यांसाठी नवीन पोलिस निवासस्थाने निर्माण करण्याची वेळ आली आहे. याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे.

** आतापर्यंत झाले केवळ वरवरचे काम

सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानांची देखभालच केली नसल्याची परिस्थिती आहे. या निवासस्थानांच्या दुरूस्तीच्या नावावर लक्षावधी रूपयांचा मलिदा लाटण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, येथे कवडीही खर्च करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. निवासस्थाने मोडकळीस आल्याने येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना निवासस्थानाशेजारी झोपड्या उभारून, टिनशेड टाकून कसाबसा निवार्‍याचा आसरा घ्यावा लागतो.

** बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संवेदनशील गावात बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलिसांना चक्क तंबू ठोकून आपले कर्तव्य बजवावे लागते. तंबू ठोकण्यासाठी कुठलाही पर्यायच येथे उपलब्ध नाही. विश्रामगृहाला मालखाना करण्यात आल्याने पोलिसांना विश्रामासाठी कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जलंब : निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने पोलिसांनी पर्यायी निवारा उभारला आहे. शिकस्त झालेली इमारत.