शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पोलिस निवासस्थानांची दुरवस्था

By admin | Updated: May 12, 2014 22:35 IST

बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब: येथील पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनिय झाल्यामुळे निवासस्थानांमध्ये राहणार्‍या पोलिसांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे निवासस्थांनांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलंब येथे ब्रिटीश काळापासून पोलिस स्टेशन आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत ४0 खेड्यांचा समावेश आहे. यासर्व गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून येथे ३५ पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कार्यरत आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी २२ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. मात्र, उभारण्यात आल्यानंतर या निवासस्थानांची देखभालच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता केवळ ५-६ निवासस्थानेच राहण्याजोगे आहेत. उर्वरीत सर्वच निवास्थानांना नरकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये बहुतांश निवासस्थानातील शौचालयाचे दरवाजे तुटले आहे. तर काही निवासस्थानाला दरवाजेच नाही. काही वर्षाअगोदर पोलिस निवासस्थानाची फक्त थातुरमातूर डागडुजीचे काम करण्यात आले होते. एक ना अनेक समस्या असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना जिव मुठीत धरुन आपले कर्तव्य बचावत राहावे लागते. पोलिसांना रात्रीच्या वेळी तडे गेलेल्या भिंतीच्या आत साप, विंचू येण्याच्या दहशतीत रात्र काढावी लागते. भिंती इतक्या जीर्ण झाल्या आहेत की उंदीर सुध्दा भिंतीवरुन गेल्यास खाली रेती व माती पडत आहे. त्याचबरोबर निवासस्थानांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पोलिसांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. डोळ्यात तेल घालून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असणार्‍या पोलिसांच्या घराचे रक्षण कोण करेल असा प्रश्न निर्माण झाला असूून जुनाट जिर्ण झालेली निवासस्थाने पाडून सर्व पोलिस कर्मचार्‍यांसाठी नवीन पोलिस निवासस्थाने निर्माण करण्याची वेळ आली आहे. याकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे.

** आतापर्यंत झाले केवळ वरवरचे काम

सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानांची देखभालच केली नसल्याची परिस्थिती आहे. या निवासस्थानांच्या दुरूस्तीच्या नावावर लक्षावधी रूपयांचा मलिदा लाटण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, येथे कवडीही खर्च करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. निवासस्थाने मोडकळीस आल्याने येथे वास्तव्यास असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना निवासस्थानाशेजारी झोपड्या उभारून, टिनशेड टाकून कसाबसा निवार्‍याचा आसरा घ्यावा लागतो.

** बंदोबस्तासाठी आलेले कर्मचारी ठोकतात तंबू

जलंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संवेदनशील गावात बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलिसांना चक्क तंबू ठोकून आपले कर्तव्य बजवावे लागते. तंबू ठोकण्यासाठी कुठलाही पर्यायच येथे उपलब्ध नाही. विश्रामगृहाला मालखाना करण्यात आल्याने पोलिसांना विश्रामासाठी कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जलंब : निवासस्थानाची दुरवस्था झाल्याने पोलिसांनी पर्यायी निवारा उभारला आहे. शिकस्त झालेली इमारत.