शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

पीडितेला पोलिसांचा ‘भरोसा’

By admin | Updated: January 2, 2017 05:14 IST

हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर राज्यातील पहिल्यावहिल्या ‘भरोसा सेल’चे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले

नागपूर : हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर राज्यातील पहिल्यावहिल्या ‘भरोसा सेल’चे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. नागपूरमध्ये सेवेसाठी १०९१ क्रमांकाची ही हेल्पलाईन आहे. तसेच १०० क्रमांकावर फोनवरून तक्रारी स्वीकारल्या जातील.‘भरोसा सेल’द्वारे पीडित महिलांना मानसिक बळ प्राप्त होईल. नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही ‘भरोसा सेल’ची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानामुळे हिंसेचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या बळावरच आम्ही पीडितांना न्याय देऊन गुन्हेगारी नियंत्रित करू शकतो. त्यातून कायद्याचा धाक निर्माण करू शकतो. पोलीस जनतेच्या मदतीकरिता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तर नितीन गडकरी म्हणाले की, कायद्याचा आदर आणि धाक असणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. कोणत्याही तक्रारीवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडवण्यावर भर द्यावा. आधी समेट आणि नंतर कायदा हे धोरण पोलिसांनी ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)