शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

पोलीस भरतीतील धाव ‘चिप’वर

By admin | Updated: February 20, 2016 03:29 IST

महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता. त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आ

डिप्पी वांकाणी,  मुंबई महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता. त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आले असून, यापुढे ५ किलोमीटरऐवजी १६०० मीटरचे तर महिलांना ८०० मीटरचे अंतर धावावे लागेल. शिवाय, उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाणार असून, या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. पोलीस खात्यात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते. यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाईल. या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. मुंबईमध्ये १.६ किलोमीटरचा मोकळा भाग कुठे आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही संपूर्ण चाचणी पूर्ण व्हायला १० दिवस तरी लागतील.इच्छुक उमेदवाराला पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी पुरुषांना हे अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांत व महिलांना २ मिनिटे ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावे लागेल. त्याशिवाय गोळाफेक, लांबउडी, जोरबैठका व १०० मीटर वेगाने धावणे या प्रत्येकाला २० गुण आहेत. किमान १० जोरबैठका उमेदवाराला काढाव्या लागतात. परंतु पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी १०० मीटरचे अंतर १२ सेकंदांत त्याला पार करावे लागते. या सगळ्या अटी महिलांनाही लागू आहेत अपवाद आहे तो जोरबैठकांच्या चाचणीचा, असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्ही कंपन्यांकडून या चिपसाठी निविदा मागविल्या असून, सध्यातरी ही एक चिप महाग (५० रुपयांना) आहे. इच्छुक उमेदवार चाचण्या देण्यासाठी ३०० रुपये शुल्क भरतो. या ३०० रुपयांतील काही पैसे राज्य सरकारला मिळतात. आम्हाला सरकारकडून या परीक्षा/चाचण्या घेण्यासाठी १.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत व एवढ्या पैशांत या परीक्षांचे व्यवस्थापन होईल अशी आम्हाला आशा आहे. ही चिप कमी किमतीत मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’ रोज आम्ही नऊ हजारांपेक्षा जास्त इच्छुकांची धावण्याची परीक्षा घेत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.गेल्या वर्षी धावण्याच्या चाचणीत काही उमेदवारांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ही चाचणी तुम्ही अगदी सकाळी किंवा सायंकाळी घेणार का, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की आम्ही आधीच धावण्याचा वेळ कमी केला असल्यामुळे चाचणीचा वेळ (सकाळ किंवा सायंकाळ) हा काही अडथळा नाही. मुंबईत सध्या आम्ही १.६ किलोमीटरचा मोकळा पट्टा शोधत आहोत. चेंबूरमधील बीपीसीएल नजिकचा पट्टा निश्चित केला असला तरी अन्य पर्यायाच्याही शोधात आहोत, असेही त्याने सांगितले. गेल्यावर्षी पाच किलोमीटरचे अंतर पार करताना चार जणांचा मृत्यू झाला व त्यानंतर तीन वेळा हे अंतर कमी करण्यात आल्याचे वृत्त