शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पोलिसांच्या ‘नैतिक ठेकेदारी’ची चौकशी

By admin | Updated: August 11, 2015 02:19 IST

पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावरून पोलिसांच्या कारवाईबाबत टीका होऊ लागल्याने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणी अपर आयुक्त पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मालवणी पोलिसांनी ६ आॅगस्टला अक्सा, मढ आणि दानापानी किनारपट्टीवर काही तळीराम आणि अश्लील चाळे करीत असल्याच्या कारणावरून ६४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यामध्ये १३ जोडप्यांचाही समावेश होता. त्यांच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड वसूल केला. ‘मॉरल पोलिसिंग’च्या नावाखाली पोलिसांनी मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप यातील काही जोडप्यांनी केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी सुरू केली आहे. यासंबंधी पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आणि कारवाईच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असून, संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून टीकाखासगीमध्ये स्त्री-पुरुष संमतीने भेटत असतील तर त्यात वावगे ते काय? त्यामुळे सार्वजनिक नीतिमत्तेला धोका कसा पोहोचतो? या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या काही जोडप्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. या मागणीला तरुणवर्गाकडून पाठिंबा मिळत असून, टिष्ट्वटर आणि सोशल मीडियावरून त्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. ‘बंद खोलीत आम्ही एकमेकांच्या संमतीने काय करतो याच्याशी पोलिसांना देणे-घेणे नाही,’ असे सांगत पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप काही जोडप्यांनी केला आहे. (प्रतिनिधी) लॉजमालक काय म्हणतात... एक तरुणी तिच्या भावी जोडीदारासोबत आली होती. त्यांना पकडल्यामुळे संबंधित तरुणीने महिला पोलिसाला थप्पड मारली. त्यानंतर महिला हवालदाराने तरुणीला मारहाण केली. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून दरवाजाला कुलूप लावले. त्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी केली. आमच्याकडे १७ गेस्ट होते. त्या सर्वांना पोलिसांनी जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये नेऊन १२०० रुपयांचा दंड ठोठावत होते, अशी माहिती कारवाई झालेल्या एका लॉज मालकाने दिली. पोलिसांनी केले समर्थन... : कारवाई झालेली जोडपी आणि सोशल मीडियावरून कारवाईवर टीका होत असली तरी पोलिसांनी मात्र कारवाईचे समर्थन केले आहे. स्थानिक रहिवाशांनी सार्वजनिक शिष्टाचाराला अडथळा आणल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यामुळे लॉजेस्ची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.