शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पोलिसांच्या ‘नैतिक ठेकेदारी’ची चौकशी

By admin | Updated: August 11, 2015 02:19 IST

पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : पश्चिम उपनगरातील मढ, अक्सा आणि दानापानी किनारपट्टीवरील प्रेमीयुगुल आणि परिसरातील लॉजेस्वर केलेली कारवाई मालवणी पोलिसांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावरून पोलिसांच्या कारवाईबाबत टीका होऊ लागल्याने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणी अपर आयुक्त पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मालवणी पोलिसांनी ६ आॅगस्टला अक्सा, मढ आणि दानापानी किनारपट्टीवर काही तळीराम आणि अश्लील चाळे करीत असल्याच्या कारणावरून ६४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यामध्ये १३ जोडप्यांचाही समावेश होता. त्यांच्याकडून प्रत्येकी १२०० रुपये दंड वसूल केला. ‘मॉरल पोलिसिंग’च्या नावाखाली पोलिसांनी मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप यातील काही जोडप्यांनी केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी सुरू केली आहे. यासंबंधी पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आणि कारवाईच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असून, संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून टीकाखासगीमध्ये स्त्री-पुरुष संमतीने भेटत असतील तर त्यात वावगे ते काय? त्यामुळे सार्वजनिक नीतिमत्तेला धोका कसा पोहोचतो? या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या काही जोडप्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. या मागणीला तरुणवर्गाकडून पाठिंबा मिळत असून, टिष्ट्वटर आणि सोशल मीडियावरून त्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. ‘बंद खोलीत आम्ही एकमेकांच्या संमतीने काय करतो याच्याशी पोलिसांना देणे-घेणे नाही,’ असे सांगत पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप काही जोडप्यांनी केला आहे. (प्रतिनिधी) लॉजमालक काय म्हणतात... एक तरुणी तिच्या भावी जोडीदारासोबत आली होती. त्यांना पकडल्यामुळे संबंधित तरुणीने महिला पोलिसाला थप्पड मारली. त्यानंतर महिला हवालदाराने तरुणीला मारहाण केली. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून दरवाजाला कुलूप लावले. त्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी केली. आमच्याकडे १७ गेस्ट होते. त्या सर्वांना पोलिसांनी जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये नेऊन १२०० रुपयांचा दंड ठोठावत होते, अशी माहिती कारवाई झालेल्या एका लॉज मालकाने दिली. पोलिसांनी केले समर्थन... : कारवाई झालेली जोडपी आणि सोशल मीडियावरून कारवाईवर टीका होत असली तरी पोलिसांनी मात्र कारवाईचे समर्थन केले आहे. स्थानिक रहिवाशांनी सार्वजनिक शिष्टाचाराला अडथळा आणल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काही तरुण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यामुळे लॉजेस्ची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.