शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

चोरगोविंदांवर पोलिसांची नजर

By admin | Updated: August 8, 2014 00:25 IST

दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे.

मुंबई : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचा ट्रेलर असणा:या नारळीपौर्णिमेला होणा:या ‘चोरगोविंदा’वर सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. चोरगोविंदाच्या आयोजकांनी या बालगोविंदाच्या मुद्दय़ावर दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आयोजकांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. 
 बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढण्यास बंदी घातली आहे. शिवाय, बालगोविंदांना चढविल्यास पोलिसांना कारवाईचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी दहीहंडी समन्वय समितीचा संघर्ष सुरू आहे तर दुस:या बाजूला चोरगोविंदाच्या आयोजकांनी मात्र याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. चोरगोविंदाच्या वेळी बालगोविंदा सहभागी झाले तर कारवाई होणार का, चोरगोविंदाला नामांकित गोविंदा पथके कोणती भूमिका घेणार, बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी सध्या गोविंदा पथकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
 नारळीपौर्णिमेला पार पडणा:या चोरगोविंदाच्या काही आयोजकांनी ‘बालहट्ट’ कायम ठेवत बालगोविंदांना चढविणारच असा आक्रमक पवित्र घेतला आहे; तर काहींनी बॅनरवरच नियम व अटींचा उल्लेख करत बालगोविंदांना थरात सहभागी होता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 
गेली कित्येक वर्षे मुंबई शहर, उपनगरांत चोरगोविंदाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी गोविंदा पथकांची रंगीत तालीम असते. यामुळे प्रत्येक गोविंदा पथकाला त्यांची सरावाची पात्रता लक्षात येते. सलामी दिल्यासही आयोजकांकडून बक्षिसांची लयलूट होते. यामध्ये पुरुषांप्रमाणो महिला गोविंदा पथकेही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होतात. (प्रतिनिधी)
 
च्आम्ही गेली 11 वर्षे चोरगोविंदाचे आयोजन करतो. गेल्या वर्षी एका गोविंदा पथकाने आठ थर लावून दहीहंडी फोडली होती. आठ थर लावायचे असल्यास त्या पथकात बालगोविंदाचा समावेश असतो. त्यामुळे आम्ही केवळ या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे  उमरखाडी येथील यंग उमरखाडी सार्वजनिक दहीहंडी मंडळाने सांगितले.
 
च्बालहक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, यंदा आमच्या उत्सवात बालगोविंदाला थरांवर चढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. बालगोविंदाच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. यासंदर्भात, आम्ही बॅनरवरच आमचा निर्णय जाहीर केल्यामुळे गोविंदा पथकांना सहभाग घेणो अधिक सोपे होईल, असे गिरगाव येथील श्री जरीमरी दहीकाला उत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी सांगितले.
 
च् बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा प्रश्नांनी गोविंदा पथकांत गोंधळ निर्माण झाला आहे.