शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
4
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
5
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
6
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
7
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
8
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
9
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
10
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
11
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
12
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
13
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
14
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
15
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
16
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
17
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
18
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
19
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

चोरगोविंदांवर पोलिसांची नजर

By admin | Updated: August 8, 2014 00:25 IST

दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे.

मुंबई : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचा ट्रेलर असणा:या नारळीपौर्णिमेला होणा:या ‘चोरगोविंदा’वर सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. चोरगोविंदाच्या आयोजकांनी या बालगोविंदाच्या मुद्दय़ावर दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आयोजकांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. 
 बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढण्यास बंदी घातली आहे. शिवाय, बालगोविंदांना चढविल्यास पोलिसांना कारवाईचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी दहीहंडी समन्वय समितीचा संघर्ष सुरू आहे तर दुस:या बाजूला चोरगोविंदाच्या आयोजकांनी मात्र याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. चोरगोविंदाच्या वेळी बालगोविंदा सहभागी झाले तर कारवाई होणार का, चोरगोविंदाला नामांकित गोविंदा पथके कोणती भूमिका घेणार, बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी सध्या गोविंदा पथकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
 नारळीपौर्णिमेला पार पडणा:या चोरगोविंदाच्या काही आयोजकांनी ‘बालहट्ट’ कायम ठेवत बालगोविंदांना चढविणारच असा आक्रमक पवित्र घेतला आहे; तर काहींनी बॅनरवरच नियम व अटींचा उल्लेख करत बालगोविंदांना थरात सहभागी होता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 
गेली कित्येक वर्षे मुंबई शहर, उपनगरांत चोरगोविंदाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी गोविंदा पथकांची रंगीत तालीम असते. यामुळे प्रत्येक गोविंदा पथकाला त्यांची सरावाची पात्रता लक्षात येते. सलामी दिल्यासही आयोजकांकडून बक्षिसांची लयलूट होते. यामध्ये पुरुषांप्रमाणो महिला गोविंदा पथकेही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होतात. (प्रतिनिधी)
 
च्आम्ही गेली 11 वर्षे चोरगोविंदाचे आयोजन करतो. गेल्या वर्षी एका गोविंदा पथकाने आठ थर लावून दहीहंडी फोडली होती. आठ थर लावायचे असल्यास त्या पथकात बालगोविंदाचा समावेश असतो. त्यामुळे आम्ही केवळ या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे  उमरखाडी येथील यंग उमरखाडी सार्वजनिक दहीहंडी मंडळाने सांगितले.
 
च्बालहक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, यंदा आमच्या उत्सवात बालगोविंदाला थरांवर चढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. बालगोविंदाच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. यासंदर्भात, आम्ही बॅनरवरच आमचा निर्णय जाहीर केल्यामुळे गोविंदा पथकांना सहभाग घेणो अधिक सोपे होईल, असे गिरगाव येथील श्री जरीमरी दहीकाला उत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी सांगितले.
 
च् बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा प्रश्नांनी गोविंदा पथकांत गोंधळ निर्माण झाला आहे.