शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मावळातील जमिनीच्या मॅटरमध्ये पोलिसांना इंटरेस्ट

By admin | Updated: May 4, 2017 02:45 IST

मुंबई व पुणे या शहरांसाठी मध्यवर्ती असा हा मावळ परिसर आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने मोठ्या प्रमाणवर

लोणावळा : मुंबई व पुणे या शहरांसाठी मध्यवर्ती असा हा मावळ परिसर आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने मोठ्या प्रमाणवर जमिन खरेदी विक़्रीचे व्यवहार या परिसरात होत आहेत. बक्कळ कमाईच्या अशा व्यवहारांमुळे खून, दरोडे, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. जमिनीला भाव आल्याने मावळ तालुका हा सोन्याचा तुकडा म्हणून ओळखला जातो. सर्वच सुखसोयींनी समृद्ध असलेल्या मावळावर अनेक धनिकांच्या नजरा आहेत. जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, मावळातील पोलीस यंत्रणेला गुन्हे रोखणे आणि त्याचा उलघडा करण्यापेक्षा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. एरवी सर्वसामान्य शेतकरी जागा जमिनींच्या वादाची प्रकरणे घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास हा सिव्हिल मॅटर आहे. तुम्ही महसूल विभागात जा, कोर्टात जा असा सल्ला देणारे काही भांडवलदार धार्जिण पोलीस धनिकांची तक्रार येताच तातडीने दखल घेत आहे. वेळप्रसंगी जागा मालक व शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जाते.धनिकांना स्थानिक गावगुंडांची व गुुन्हेगारांची साथ मिळत आहे. जमीन फसवणुकीचे प्रकार दाबण्यासाठी व दबाव टाकण्यासाठी पोलिसांचा आसरा मिळतो. यातून हात चांगलेच ओले होतात. त्यामुळे काही अधिकाऱ्यांची सिव्हिल केसमध्ये आवड वाढलीय. (वार्ताहर)पोलिसांकडून एकाही गुन्ह्याचा नाही छडालोणावळ्यातील महाविद्यालयीन युवक-युवतीच्या खूनाला एक महिना उलटला तरी, अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हातील लागलेले नाहीत. तसेच धामणे येथील दरोड्यात आई-वडिलांसह मुलाची हत्या करण्यात आली होती. या तपासात पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप आरोपींचा छडा लागलेला नाही. त्याचप्रमाणे सांगवडेतील महिला सरपंचाच्या पतीची निर्घृन हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात दिरंगाईमुळे या हत्येचे सूत्रधार देखील अद्याप मोकाट आहे. आर्थिक पोत सुधारतोखरे तर मावळ तालुक्यात येण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांना वरिष्ठांकडे बोली लावावी लागते, असे सर्रास बोलले जाते. मात्र, पोलिसांची कार्यपद्धती पाहिल्यास त्यात तथ्य असल्याचे जाणवते. मावळात किंवा लोणावळा परिसरात पोलीस येण्यापूर्वीची त्याची आर्थिक परिस्थिती काय होती. वर्ष दोन वर्षे झाल्यानंतर त्याच्या रहाणीमानात कसा बदल होतो, आर्थिकदृष्टया अधिकारी कसे सुधारतात हे बदल सर्वसामान्यांना दिसतो.